शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

३६५ मद्य दुकानांच्या प्रस्तावांना मिळाली मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:08 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरी भागातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याच्या जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील ३६५ दुकाने शुक्रवारपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरी भागातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याच्या जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील ३६५ दुकाने शुक्रवारपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून राष्टÑीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण अकराशे दुकानांपैकी त्यातील सुमारे ७० टक्के दुकाने बंद करण्यात आली होती. देशपातळीवरच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बंधनकारक असल्यामुळे यासंदर्भात चंदीगढच्या व्यावसायिकांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्याने गेल्या महिन्यात न्यायालयाने महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गाला डिसेंबर १६ मध्ये देण्यात आलेला निर्णय लागू राहणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने त्याच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु शासकीय पातळीवर न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेतली जात नसल्याचे पाहून नागपूरच्या मद्य विक्रेत्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने नागपूरच्या व्यावसायिकांची दुकाने तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. मंगळवारी अनंत चतुर्दशीमुळे ड्राय डे व शासकीय सुटी असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने काहीच पावले उचलली नाहीत. मात्र बुधवारी जिल्ह्यातील ३६५ मद्य विक्रीच्या दुकानांचे परवाने नूतनीकरणाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केले, त्याला गुरुवारी मान्यता देण्यात आली.