शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

३५० कोटींचा पालिकेला फटका

By admin | Updated: August 2, 2015 00:06 IST

एलबीटी रद्द : शासनाने भार उचलण्याची मागणी

नाशिक : व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर भाजपा सरकारने सत्तेवर येताच रद्द केलेला एलबीटीचा निर्णय नाशिक महापालिकेला चांगलाच भोवणार असून, या निर्णयामुळे विकासकामे सोडाच; परंतु कर्मचाऱ्यांना पगार देणे आणि प्रशासकीय कामे करणे यासाठीही कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. जकात गेल्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पालिका स्वयंपूर्ण होण्याच्या तयारीत असतानाच शासनाने एलबीटीही रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यातही सरसकट रद्द न करता केवळ ५० कोटी रुपयांच्या आत उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच एलबीटीतून सूट दिली गेली. त्यामुळे ९० टक्के व्यापारी सुटले आणि पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत कमी झाला. एलबीटीतून यंदा महापालिकेने ७०० कोटी रुपयांचा टप्पा गाठायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी पालिका स्वयंपूर्ण होईल, अशी अपेक्षा महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी बाळगून होते. परंतु एलबीटी रद्दच्या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ३५० कोटींचा बोजा पडणार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ९० टक्के व्यापाऱ्यांकडून मिळणारी रक्कम सुमारे ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. उर्वरित रकमेत महापालिकेला कर आणि स्टॅम्प ड्युटी यांच्यातून सुमारे ३५० कोटी रुपये मिळतात. त्यामुळे ७०० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न गृहीत धरल्यास पालिकेला आता वार्षिक ३५० कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)