शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

बांधकाम, पाटबंधारे आणि पशुसंवर्धन कर्मचार्‍यांच्या ३५ बदल्या

By admin | Updated: May 20, 2014 00:33 IST

आरोेग्यच्या ७६ बदल्या; विनंती बदल्यांमध्ये कर्मचार्‍यांची नाराजी

आरोेग्यच्या ७६ बदल्या; विनंती बदल्यांमध्ये कर्मचार्‍यांची नाराजीनाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या धामधुमीत रविवार व सोमवार मिळून १११ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यात रविवारी आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७६, तर बांधकाम, पशुसंवर्धन व लघु पाटबंधारे विभागाच्या ३५ बदल्यांचा समावेश आहे.रविवारी आरोग्य विभागातील आरोग्यसेविका व औषधनिर्माता या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यात ६४ आरोग्यसेविकांच्या प्रशासकीय, तर चार आरोग्यसेविकांच्या विनंती बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे औषधनिर्माता या संवर्गातील आठ प्रशासकीय बदल्या झाल्या. आरोेग्यसेविकांच्या विनंती बदल्यांमध्ये काही महिला कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. मालेगावहून कळवणची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात पेठ तालुक्यात बदली करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लघु पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता संवर्गातील सहा प्रशासकीय व दोन विनंती अशा एकूण आठ बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील एक विनंती बदली करण्यात आली, तर प्रशासकीय बदल्यांमध्ये पाचही कर्मचार्‍यांनी नकार दिलेला असताना एका कर्मचार्‍याची समतोल राखण्यासाठी बदली करण्यात आली. कनिष्ठ अभियंता संवर्गातील पेसा (आदिवासी) क्षेत्राबाहेर तीन प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, तर बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात आठ बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. पशुसंवर्धन विभागातील जागा रिक्त नसल्याने सहायक पशुधन विकास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत, तर पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पेसातून बाहेर तीन प्रशासकीय, तर आदिवासी भागात नऊ प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रात दोन विनंती बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कार्यकारी अभियंता विष्णू पालवे, अनिल अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..ऑनलाइन बदल्यांचे आदेश कागदावरचमागील तीन वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बदल्यांची कार्यवाही झाल्याबरोबर लगेचच कर्मचार्‍याच्या हाती नियुक्ती झालेल्या ठिकाणचा बदली आदेश समुपदेशनाच्या वेळी दिला होता. यावर्षी मात्र अर्थ, सामान्य प्रशासन, कृषी, आरोग्य, बांधकाम, लपा, पशुसंवर्धन अशा अनेक विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या; मात्र यातील बहुतेक कर्मचार्‍यांना बदल्यांचे आदेशच प्राप्त झालेले नाहीत. ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे.