शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

३५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

By admin | Updated: September 19, 2015 22:59 IST

आत्महत्त्या : १९ जणांना मदत नाकारली

नाशिक : गत वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने उडवलेली दाणादाण व यंदाही पावसाने फिरविलेली पाठ यातून जिल्ह्णात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून, गेल्या नऊ महिन्यांत ५४ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्त्या केल्या असल्या तरी, त्यातील ३५ शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली आहे. शनिवारी शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी मदत करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली, त्यात आजवर शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्यांच्या प्रकरणांची चर्चा होऊन सात आत्महत्त्येच्या प्रकरणांची चर्चा करण्यात आली. त्यात तीन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचा अहवाल पोलीस व कृषी खात्याने सादर केला असल्याने त्यांना मंजुरी देण्यात आली. तीन प्रकरणे नाकारून एक प्रकरण फेर चौकशीसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्णात ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यात काहींनी विहिरीत उडी घेऊन, तर काहींनी विषारी औषध सेवन करून तसेच रेल्वेखाली उडीही घेण्यात आलेली आहे. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची खातरजमा केली असता फक्त ३५ शेतकरीच खऱ्या अर्थाने कर्जबाजारी होते व त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असल्याने मृत शेतकऱ्यांच्या एका वारसाला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तर अन्य शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्त्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना मदत नाकारण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्त्या

नऊ महिन्यांत जिल्ह्णात आत्महत्त्या केलेल्या; परंतु शासकीय मदतीस पात्र ठरलेल्या ३५ शेतकऱ्यांपैकी एकट्या मालेगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्या खालोखाल बागलाण (९), नांदगाव व निफाड प्रत्येकी पाच, सिन्नर (२), चांदवड (३), येवला, दिंडोरी, इगतपुरी व कळवण या चार तालुक्यांत प्रत्येकी एक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केली आहे.