शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

३५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

By admin | Updated: September 19, 2015 22:59 IST

आत्महत्त्या : १९ जणांना मदत नाकारली

नाशिक : गत वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने उडवलेली दाणादाण व यंदाही पावसाने फिरविलेली पाठ यातून जिल्ह्णात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून, गेल्या नऊ महिन्यांत ५४ शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्त्या केल्या असल्या तरी, त्यातील ३५ शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली आहे. शनिवारी शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी मदत करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली, त्यात आजवर शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्यांच्या प्रकरणांची चर्चा होऊन सात आत्महत्त्येच्या प्रकरणांची चर्चा करण्यात आली. त्यात तीन प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचा अहवाल पोलीस व कृषी खात्याने सादर केला असल्याने त्यांना मंजुरी देण्यात आली. तीन प्रकरणे नाकारून एक प्रकरण फेर चौकशीसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्णात ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यात काहींनी विहिरीत उडी घेऊन, तर काहींनी विषारी औषध सेवन करून तसेच रेल्वेखाली उडीही घेण्यात आलेली आहे. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची खातरजमा केली असता फक्त ३५ शेतकरीच खऱ्या अर्थाने कर्जबाजारी होते व त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असल्याने मृत शेतकऱ्यांच्या एका वारसाला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तर अन्य शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्त्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना मदत नाकारण्यात आली आहे. सर्वाधिक आत्महत्त्या

नऊ महिन्यांत जिल्ह्णात आत्महत्त्या केलेल्या; परंतु शासकीय मदतीस पात्र ठरलेल्या ३५ शेतकऱ्यांपैकी एकट्या मालेगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्या खालोखाल बागलाण (९), नांदगाव व निफाड प्रत्येकी पाच, सिन्नर (२), चांदवड (३), येवला, दिंडोरी, इगतपुरी व कळवण या चार तालुक्यांत प्रत्येकी एक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केली आहे.