शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

महिनाभरात ३४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:22 IST

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे. पेठ तालुक्यात आतापावेतो अवघा १४.३९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.नाशिक जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५,००४.६९ मि.मी. इतके आहे. त्यात पावसाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३०५७.९८ सरासरी पर्जन्यमान असते. तर सर्वात कमी पर्जन्यमान देवळा तालुक्यात ४२२.०७ मि.मी. नोंदविले जाते.---------------------१ यावर्षी हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तविलेला आहे. त्यानुसार महाराष्टÑात मान्सूनचे वेळेत आगमन होऊन जिल्ह्यातही सर्वत्र पावसाने आतापर्यंत समाधान कारक हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यात १ जून ते ९ जुलै २०२० या कालावधीत सरासरी ३३९.८३ मि.मी. म्हणजेच ३३.९७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.२ मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३०५.५१ मि.मी. पाऊस कोसळला होता. यंदा त्यात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९०.९५ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. सरासरीच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या बागलाण तालुक्यात मागील वर्षी याच कालावधीत कमी पर्जन्यमान नोंदले गेले होते. त्यावेळी अवघा १०३ मि.मी. पाऊस झाला होता.३ यंदा मात्र ४८८.२० मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या बागलाण तालुक्यात आतापर्यंत ४४४ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. निफाड आणि अवर्षणग्रस्त मालेगाव तालुक्यातही यंदा ७५ टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. मागील वर्षी पेठ तालुक्यात जून-जुलै कालावधीत ८५५ मि.मी. पाऊस कोसळलेला होता.

टॅग्स :Nashikनाशिक