शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४५ हजारांत लागले ३०० विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

शुभमंगल वार्ता : लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाहाला प्राधान्य नाशिक: अनेकविध कारणांमुळे कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असेल अशा वेळी विवाहयोग्य मुलगा-मुलगी ...

शुभमंगल वार्ता : लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाहाला प्राधान्य

नाशिक: अनेकविध कारणांमुळे कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असेल अशा वेळी विवाहयोग्य मुलगा-मुलगी कायदेशीररित्या नोंदणी विवाहाचा मार्ग अवलंबितात. परंतु कोरोनातील निर्बंधामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या मार्च ते जुलै पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात ३०५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. विशेष म्हणजे उभयतांच्या कुटुंबीयांच्या साक्षीने राजीखुशीने असे विवाह पार पडले आहेत.

कोरोनाच्या निर्बंधामुळे जुळलेल्या विवाहांना अनेक अडचणी आल्या. एकतर लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने त्यांना मुहूर्तही चुकविणे शक्य नव्हते. याबारोबरच जास्त लोकही विवाहाला बोलविता येत नसल्याने अशावेळी नोंदणी पद्धतीचा विवाह हाच पर्याय समेार असल्याने या काळात नेांदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या ३०५ इतकी आहे.

नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये इतके शुल्क लागते. त्यानुसार मार्च ते जुलै या कालावधीत अवघ्या ४५, ७५० रुपयांमध्ये ३०५ विवाह उरकले आहेत. मार्चपासून असलेल्या कोरोनाच्या काळात ठरवून नोंदणी विवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निमित्ताने नोंदणी विवाह विषयक जनजागृतीदेखील होण्यास मदत झाली आहे.

कोरोनाच्या या कालावधीत ठरवून नोंदणी विवाह करणाऱ्यांची जशी संख्या वाढलेली दिसत. त्या प्रमाणात लग्नाची नोंदणी करण्यासाठी देखील दाम्पत्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारच्या ५१ जोडप्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी केलेली आहे.

--इन्फो--

विवाह कक्ष

नोंदणी पद्धतीने विवाह केला जात असला तरी केवळ कार्यालयात स्वाक्षरी करून विवाहाचे सोपस्कर पार पाडण्यापेक्षा आता नोंदणी कार्यालयातच वधूवर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लाल गालिचा टाकून विवाहाचा कक्ष आकर्षक करण्यात आला आहेे. नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी पद्धतीने या कार्यालयात विवाहाचे सोपस्कर पूर्ण केले जाते.

--इन्फो--

दीडशे रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते. या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३६ जोडप्यांनी लग्नाबाबतची नोटीस दिली होती. त्यापैकी ३०५ जणांचा विवाह पार पडला. १५० रुपये याप्रमाणे ४५,७५० रुपयांमध्ये येथे ३०५ विवाह पार पडले. नोंदणी विवाह करणाऱ्यांना आगाऊ नोटीस द्यावी लागते. या कालावधीत कुणाचीही हरकत आली तर अशा जोडप्यांचा विवाह कायदेशीररित्या लावून दिला जातो.

--इन्फो--

विशेष विवाह नोंदणी २०२१

मार्च - ९६

एप्रिल- ४४

मे - ५८

जून- ६२

जुलै- ४५

(गुड मॉर्निग पानासाठी)