शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अवघ्या ४५ हजारांत लागले ३०० विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

शुभमंगल वार्ता : लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाहाला प्राधान्य नाशिक: अनेकविध कारणांमुळे कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असेल अशा वेळी विवाहयोग्य मुलगा-मुलगी ...

शुभमंगल वार्ता : लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाहाला प्राधान्य

नाशिक: अनेकविध कारणांमुळे कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असेल अशा वेळी विवाहयोग्य मुलगा-मुलगी कायदेशीररित्या नोंदणी विवाहाचा मार्ग अवलंबितात. परंतु कोरोनातील निर्बंधामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या मार्च ते जुलै पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात ३०५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. विशेष म्हणजे उभयतांच्या कुटुंबीयांच्या साक्षीने राजीखुशीने असे विवाह पार पडले आहेत.

कोरोनाच्या निर्बंधामुळे जुळलेल्या विवाहांना अनेक अडचणी आल्या. एकतर लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने त्यांना मुहूर्तही चुकविणे शक्य नव्हते. याबारोबरच जास्त लोकही विवाहाला बोलविता येत नसल्याने अशावेळी नोंदणी पद्धतीचा विवाह हाच पर्याय समेार असल्याने या काळात नेांदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या ३०५ इतकी आहे.

नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये इतके शुल्क लागते. त्यानुसार मार्च ते जुलै या कालावधीत अवघ्या ४५, ७५० रुपयांमध्ये ३०५ विवाह उरकले आहेत. मार्चपासून असलेल्या कोरोनाच्या काळात ठरवून नोंदणी विवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निमित्ताने नोंदणी विवाह विषयक जनजागृतीदेखील होण्यास मदत झाली आहे.

कोरोनाच्या या कालावधीत ठरवून नोंदणी विवाह करणाऱ्यांची जशी संख्या वाढलेली दिसत. त्या प्रमाणात लग्नाची नोंदणी करण्यासाठी देखील दाम्पत्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारच्या ५१ जोडप्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी केलेली आहे.

--इन्फो--

विवाह कक्ष

नोंदणी पद्धतीने विवाह केला जात असला तरी केवळ कार्यालयात स्वाक्षरी करून विवाहाचे सोपस्कर पार पाडण्यापेक्षा आता नोंदणी कार्यालयातच वधूवर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लाल गालिचा टाकून विवाहाचा कक्ष आकर्षक करण्यात आला आहेे. नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी पद्धतीने या कार्यालयात विवाहाचे सोपस्कर पूर्ण केले जाते.

--इन्फो--

दीडशे रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते. या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३६ जोडप्यांनी लग्नाबाबतची नोटीस दिली होती. त्यापैकी ३०५ जणांचा विवाह पार पडला. १५० रुपये याप्रमाणे ४५,७५० रुपयांमध्ये येथे ३०५ विवाह पार पडले. नोंदणी विवाह करणाऱ्यांना आगाऊ नोटीस द्यावी लागते. या कालावधीत कुणाचीही हरकत आली तर अशा जोडप्यांचा विवाह कायदेशीररित्या लावून दिला जातो.

--इन्फो--

विशेष विवाह नोंदणी २०२१

मार्च - ९६

एप्रिल- ४४

मे - ५८

जून- ६२

जुलै- ४५

(गुड मॉर्निग पानासाठी)