शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८ लाख प्राधान्यक्रम कुटुंब; दीड लाख अंत्योदय कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ...

नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे. धान्य वाटपाबाबतचे अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेले नसले तरी त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.

राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, व्यवहार बंद राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू राहणार असून खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम कमी होणार असल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पॅकेजची घाेषणा केेलेली आहे. त्यानुसार गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी राज्य सरकारने पुढील महिनाभर ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत धान्य देण्याची योजना आखली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंबातील नागरिकांना होणार आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या२८,२५,१९५

--इन्फो--

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

शासनाकडून मोफत धान्य योजना सुरू करण्यात आल्यामुळे रोटीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. परंतु रेशन दुकानदारांकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याने नेमके धान्य कोणत्या योजनेचे मिळते हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा एका योजनेचा लाभ मिळत असताना हक्काचे दरमहा मिळणारे धान्य कमी मिळते. त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा ही अपेक्षा

- चिंतामण पारेसर, लाभार्थी.

मागील लॉकडाऊनमध्ये मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे आमच्या चुली पेटल्या. आता राज्य शासनाकडून मोफत धान्य दिले जाणार असल्याचे समजले. मागे चार महिने मोफत धान्य योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु शेवटच्या महिन्यात धान्य मिळालेले नाही. आता ही योजना केवळ एका महिन्यासाठी असल्याने योजनेतून पुरेपूर धान्य मिळाले पाहिजे.

- मालतीबाई घाटोळ, लाभार्थी

यावेळी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेच मोफत धान्य देखील मिळणार असल्याने कामगार वर्गाची चिंता मिटणार आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जाणार असल्याने संसाराला हातभार नक्कीच लाभेल. शासनाकडून दखल घेण्यात आल्याने निदान रोटी तरी मिळणार आहे

- शांताराम राऊत, लाभार्थी

--इन्फो--

महिनाभर मिळणार मोफत गहू, तांदूळ

राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे अनेक निर्बंध आले आहेत. याकाळात अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्यामुळे त्यांच्या रोटीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्य पुरवठा केला जाणार आहे.

या योजनेचा लाभ अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटूंबातील सदस्यांना होणार आहे. जिल्ह्यात ७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबातील सदस्य आहेत. या सर्वांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे.