शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

जिल्ह्यात २८ लाख प्राधान्यक्रम कुटुंब; दीड लाख अंत्योदय कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ...

नाशिक: राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे. धान्य वाटपाबाबतचे अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेले नसले तरी त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.

राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, व्यवहार बंद राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू राहणार असून खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम कमी होणार असल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पॅकेजची घाेषणा केेलेली आहे. त्यानुसार गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी राज्य सरकारने पुढील महिनाभर ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत धान्य देण्याची योजना आखली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंबातील नागरिकांना होणार आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या२८,२५,१९५

--इन्फो--

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

शासनाकडून मोफत धान्य योजना सुरू करण्यात आल्यामुळे रोटीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. परंतु रेशन दुकानदारांकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याने नेमके धान्य कोणत्या योजनेचे मिळते हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा एका योजनेचा लाभ मिळत असताना हक्काचे दरमहा मिळणारे धान्य कमी मिळते. त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा ही अपेक्षा

- चिंतामण पारेसर, लाभार्थी.

मागील लॉकडाऊनमध्ये मोफत धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे आमच्या चुली पेटल्या. आता राज्य शासनाकडून मोफत धान्य दिले जाणार असल्याचे समजले. मागे चार महिने मोफत धान्य योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु शेवटच्या महिन्यात धान्य मिळालेले नाही. आता ही योजना केवळ एका महिन्यासाठी असल्याने योजनेतून पुरेपूर धान्य मिळाले पाहिजे.

- मालतीबाई घाटोळ, लाभार्थी

यावेळी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेच मोफत धान्य देखील मिळणार असल्याने कामगार वर्गाची चिंता मिटणार आहे. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जाणार असल्याने संसाराला हातभार नक्कीच लाभेल. शासनाकडून दखल घेण्यात आल्याने निदान रोटी तरी मिळणार आहे

- शांताराम राऊत, लाभार्थी

--इन्फो--

महिनाभर मिळणार मोफत गहू, तांदूळ

राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे अनेक निर्बंध आले आहेत. याकाळात अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्यामुळे त्यांच्या रोटीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्य पुरवठा केला जाणार आहे.

या योजनेचा लाभ अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटूंबातील सदस्यांना होणार आहे. जिल्ह्यात ७२३४८ अंत्योदय कार्डधारक तसेच २८,३५,,१३६ प्राधान्यक्रम कुटुंबातील सदस्य आहेत. या सर्वांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे.