शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

२६ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: February 28, 2017 00:44 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत २६ पैकी राष्ट्रवादीवगळता विविध राष्ट्रीय पक्षांच्या पंधरा मातब्बर उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत २६ पैकी राष्ट्रवादीवगळता विविध राष्ट्रीय पक्षांच्या पंधरा मातब्बर उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली आहे.बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटात षष्ठरंगी लढत रंगली होती. निवडणुकीच्या दोन महिने आधीच आदिवासी नेत्यांनी एकत्र येत आदिवासी विकास आघाडी स्थापन करून माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे पुत्र गणेश यांना आघाडीची उमेदवारी जाहीर केली होती, तर आदिवासींच्या या लढ्यात राष्ट्रवादीने तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हातात गड राखण्याची जबाबदारी दिली होती. या धर्मयुद्धात भाजपाने संघ परिवारातील आदिवासी आरोग्यसेवक मन्साराम गावित यांना, तर बहुजन समाज पार्टीने माजी पोलीस हवालदार शिवदास सोनवणे यांना उमेदवारी बहाल केली होती. गटाबाहेरील मुल्हेरचे उपसरपंच सुभाष येवला व संजय देशमुख यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली. परंतु अखेरच्या चरणात गणेश अहिरे आणि संजय सोनवणे यांच्यातील सरळ लढतीत गणेश अहिरे यांनी ३५३० मतांची आघाडी घेत विजय मिळविला. मात्र चुरशीच्या लढतीत चीत झालेले राष्ट्रवादीचे संजय सोनवणे वगळता सर्वांची अनामत जप्त झाली. याच गटात समाविष्ट असलेल्या मानूर गणातील भास्कर गांगुर्डे या भाजपाच्या उमेदवारालाही अनामत सांभाळता आली नाही. तब्बल चार ते साडेचार दशके दीर्घकाळ सत्ता राहिलेल्या कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची अनामत जप्त होऊन अक्षरश: कचरा झाल्याचे चित्र बघायला मिळाले.वीरगाव गट हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या एक दशकापासून या गटावर कॉँग्रेसची राजवट होती. सत्ता राखण्यासाठी बागलाण पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती सीताबाई बागुल यांना पाचारण करून श्रेष्ठींनी त्यांना तिकीट दिले. मात्र संपर्काचा अभाव, ढिसाळ प्रचारयंत्रणा यामुळे हजाराचा आकडादेखील त्या पार करू शकल्या नाही. त्यांच्यावरही अनामत गमवण्याची वेळ आली. कंधाणे गणातील याच पक्षाच्या उमेदवार अवघे ३८३ मते मिळाली. त्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. नामपूर गटात र्कांग्रेसला शरद पवार या नावाची बडी हस्ती गळाला लागली होती. याच गटातील अपक्ष उमेदवार निवृत्ती देवराम पवार, रमेश रामचंद्र पवार यांचीही अनामत जप्त झाली.जायखेडा गटात राष्ट्रवादीचे यतीन पगार यांनी तालुक्यात सर्वाधिक ६३३६ इतके मते मिळवून सर्वांना धक्काच दिला. त्यांना अपक्ष डॉ. नविलसंग खैरनार यांनी एकाकी झुंज दिली. या लढाईत कॉँग्रेस, भाजपा, सेना यांना पराभूत केले. या लढाईत शिवसेनेचे शरद देवरे यांना मात्र पाचशेचा आकडादेखील पार करता न आल्यामुळे त्यांच्यावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली. देवरे यांच्या गणातील शिलेदारांची तीच अवस्था आहे. जायखेडा गणातील ललिता देवीदास भामरे व आसखेडा गणातील प्रवीण कौतिक अहिरे यांनादेखील अनामत सांभाळता आली नाही. या गणातील गणेश कौतिक सूर्यवंशी या अपक्ष उमेदवाराची अनामत जप्त झाली. याच गटात भाजपाचे उमेदवार व नामपूर हे आपले होमग्राउंड सोडून जायखेडा गटात नशीब आजमावण्यासाठी आलेले डॉक्टर सी. एन पाटील याांनादेखील अनामत वाचवता आली नाही. मुंजवाड गणात माजी पंचायत समिती सदस्य संजय गरुड अपक्ष म्हणून नशीब आजमावत होते. परंतु ते कमनशिबी ठरले. त्यांच्यासह नरेंद्र खरे यांची अनामत जप्त झाली, तर ब्राह्मणगाव गणात धर्मा पारखे यांना अनामत गमवावी लागली. वीरगाव गटात आदर्शगाव किकवारीच्या सरपंच मंजुळाबाई जहागीरदार या सेनेच्या उमेदवार यांचीही अनामत जप्त झाली. त्यांच्या शिलेदार कंधाणे गणातील सेनेच्या उमेदवार प्रमिला गावित यांचीही अशीच अवस्था झाली. नामपूर गटात मनसेचे डॉ. राजराम अहिरे यांच्यासह नामपूर गणातील त्याच्या शिलेदार हेमांगी चौधरी तालुक्यातील एकमेव मनसेने गट व गणात दिलेल्या दोघांची अनामत जप्त झाली आहे.