शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४९१८ बाधितांसह २५ कोरोना बाधितांचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST

जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी नवीन उच्चांक स्थापित करत पाच हजारांनजीक मजल मारली. त्यात नाशिक मनपामध्ये २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ ...

जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी नवीन उच्चांक स्थापित करत पाच हजारांनजीक मजल मारली. त्यात नाशिक मनपामध्ये २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १८५ व जिल्हाबाह्य १५४ रुग्ण बाधित आहेत.जिल्ह्यात सोमवारी तब्बल ४,९१८ बाधित रुग्ण तर १५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ८, ग्रामीणला १२ , मालेगावला ४ तर जिल्हाबाह्य १ असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,३०८ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्यानंतर प्रारंभी तीन हजार तर शुक्रवारी बाधित संख्येने चार हजारापर्यंत मजल मारल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा बाधित संख्येत हजाराची भर पडल्याने बाधितांचा आकडा ५ हजारांनजीक पोहोचला आहे. चार दिवसांपासून बाधित संख्येने त्यापेक्षाही खूप मोठ्या उड्या मारल्याने जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात प्रथमच नाशिकपेक्षा अधिक

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकाच दिवसात प्रथमच शहरातील बाधितांपेक्षा मोठी मजल गाठल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव शहराच्या बरोबरीनेच होऊ लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी नाशिक शहरात २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ इतके तीनशेहून अधिक बाधित प्रथमच आढळले आहेत.

इन्फो

प्रलंबित अहवाल सहा हजारांनजीक

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी ही संख्या ५ हजार ९१९ वर पोहोचली आहे. बाधितांच्या आकड्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि अहवाल मिळण्यास मर्यादा असल्याने प्रलंबित संख्या सातत्याने ६ हजारांनजीक पोहोचल्याने नवीन आठवड्यातही बाधित संख्या मोठीच राहण्याची चिन्हे आहेत.

इन्फो

बळीतील वाढ चिंताजनक

कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दुपटीहून अधिक झाली आहे. कोरोनाबळी दहा आणि वीसवर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. त्यात आठवडाभरात १० नंतर १२ त्यानंतर १५ बळी गेल्यानंतर शुक्रवारी ९ वर आलेली बळींची संख्या दुपटीहून अधिक वाढून थेट २५ वर पोहोचल्याने बळींची वाढती संख्या हा नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत आहे.