शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

तब्बल ४९१८ बाधितांसह २५ कोरोना बाधितांचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST

जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी नवीन उच्चांक स्थापित करत पाच हजारांनजीक मजल मारली. त्यात नाशिक मनपामध्ये २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ ...

जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी नवीन उच्चांक स्थापित करत पाच हजारांनजीक मजल मारली. त्यात नाशिक मनपामध्ये २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १८५ व जिल्हाबाह्य १५४ रुग्ण बाधित आहेत.जिल्ह्यात सोमवारी तब्बल ४,९१८ बाधित रुग्ण तर १५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ८, ग्रामीणला १२ , मालेगावला ४ तर जिल्हाबाह्य १ असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,३०८ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्यानंतर प्रारंभी तीन हजार तर शुक्रवारी बाधित संख्येने चार हजारापर्यंत मजल मारल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा बाधित संख्येत हजाराची भर पडल्याने बाधितांचा आकडा ५ हजारांनजीक पोहोचला आहे. चार दिवसांपासून बाधित संख्येने त्यापेक्षाही खूप मोठ्या उड्या मारल्याने जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात प्रथमच नाशिकपेक्षा अधिक

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकाच दिवसात प्रथमच शहरातील बाधितांपेक्षा मोठी मजल गाठल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव शहराच्या बरोबरीनेच होऊ लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी नाशिक शहरात २१८१ तर नाशिक ग्रामीणला २४९८ इतके तीनशेहून अधिक बाधित प्रथमच आढळले आहेत.

इन्फो

प्रलंबित अहवाल सहा हजारांनजीक

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी ही संख्या ५ हजार ९१९ वर पोहोचली आहे. बाधितांच्या आकड्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि अहवाल मिळण्यास मर्यादा असल्याने प्रलंबित संख्या सातत्याने ६ हजारांनजीक पोहोचल्याने नवीन आठवड्यातही बाधित संख्या मोठीच राहण्याची चिन्हे आहेत.

इन्फो

बळीतील वाढ चिंताजनक

कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दुपटीहून अधिक झाली आहे. कोरोनाबळी दहा आणि वीसवर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. त्यात आठवडाभरात १० नंतर १२ त्यानंतर १५ बळी गेल्यानंतर शुक्रवारी ९ वर आलेली बळींची संख्या दुपटीहून अधिक वाढून थेट २५ वर पोहोचल्याने बळींची वाढती संख्या हा नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत आहे.