शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून २०८ शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

नाशिक : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण होऊ ...

नाशिक : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोरोनामुक्त गावात ज्या ठिकाणी शाळा सुरू आहेत, अशा २०८ शाळांच्या ठिकाणी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावांपैकी २०८ शाळांमध्ये सोमवारी (दि. १९) प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा घंटा वाजली. उर्वरित शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करताना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, ज्या शिक्षकांची चाचणी झालेली आहे, अशाच शिक्षकांनी पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि कोरोनापश्चात आजारांबाबत आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. १७) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एका महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

---

पॉइंटर-

आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - १०,२१७

पहिल्या दिवशी सुरू झालेल्या शाळा - २०८

पहिल्या दिवशी टेस्टिंग करून शाळेत आलेले - ६२४

----

आठवी ते बारावीचे विद्यार्थी

वर्ग - मुले - मुली - एकूण

आठवी - ६२३८७ - ५५९४५ - ११८३३२

नववी - ६१३६२ - ५४५४८ - ११५९१०

दहावी - ५९८२४ - ५१५९७ - १११४२१

अकरावी - ५२८०३ - ४६१४६ - ९८९४९

बारावी - ३५६०७ - ३२५५३ - ६८१६०

---

पहिल्या दिवशी २०८ शाळा उघडल्या

पूर्वसूचनेमुळे शिक्षकांनी करून घेतली चाचणी

राज्य शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांनी पुढाकार घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली होती. जिल्ह्यात २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. या शाळांमध्ये जवळपास सव्वासहाशे शिक्षकांनी कोरोना चाचणी केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच अध्यापन सुरू केले आहे.

----

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३३५ शाळा कोरोनामुक्त आहेत. त्यापैकी २०८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने अनुकूल परिस्थितीनुसार आणखी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

- डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी