शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

२०० पैकी दिले २०५ गुण

By admin | Updated: September 17, 2016 00:40 IST

आरोग्य विद्यापीठाचा घोळ : सारवासारव करण्यासाठी यंत्रणेची धावपळ

संदीप भालेराव  नाशिकआरोग्य विद्यापीठातील परीक्षा विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्यामुळे परीक्षा आणि निकाल यात कोणताही गोंधळ होत नसल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला चक्क २०० गुणांपैकी २०५ गुण बहाल करण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला असून लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी १२४ गुण देण्याची किमया विद्यापीठाने केली आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सध्याचे कामकाज अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध होत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. विशेषत: परीक्षा विभागाने अनेक बदल करीत परीक्षा आणि निकाल यंत्रणेतील त्रुटी दूर करून बिनचूक कामकाज सुरू केल्याचा छातीठोक दावा परीक्षा नियंत्रकांकडून वारंवार केला जातो; मात्र एमबीबीएस प्रथम वर्ष निकालातील एका गुणपत्रकामुळे परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बायो केमेस्ट्री या विषयात २०० पैकी २०५ गुण गुणपत्रिकेत दर्शविण्यात आले आहेत. शिवाय लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी चक्क १२४ गुण देऊन विद्यापीठाने कळसच केला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सदर बाब संबंधित विद्यार्थ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने विद्यापीठाकडे त्याबाबतची तक्रार केल्यानंतर विद्यापीठ खडबडून जागे झाले. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संबंधितांनी दुरुस्ती करून त्यास सुधारित गुणपत्रक बहाल केले; मात्र या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, अशी तंबीच संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयादेखील दिल्याचे समजते.सुधारित गुणपत्रकामध्ये विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १०० पैकी ७५ आणि एकूण गुण दोनशे पैकी १५६ गुण देण्यात येऊन दुरुस्ती करण्यात आली; मात्र हा सर्व अनागोंदी प्रकार केवळ एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नसून काही विद्यार्थ्यांच्या निकालातही असा प्रकार घडल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठाच्या वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना या प्रकरणाविषयी चर्चा न करण्याचे फर्मान सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंत्रणेतील सुधारणेबाबत कितीही दावे केले जात असले तरी परीक्षेतील गोंधळाचे प्रकार सुरूच असून प्रॅक्टिकल्सच्या गुणांचा घोळ आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबाबत विद्यापीठाला अद्यापही यश आलेले नाही.