शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

२०० पैकी दिले २०५ गुण

By admin | Updated: September 17, 2016 00:40 IST

आरोग्य विद्यापीठाचा घोळ : सारवासारव करण्यासाठी यंत्रणेची धावपळ

संदीप भालेराव  नाशिकआरोग्य विद्यापीठातील परीक्षा विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्यामुळे परीक्षा आणि निकाल यात कोणताही गोंधळ होत नसल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विद्यापीठाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला चक्क २०० गुणांपैकी २०५ गुण बहाल करण्याचा पराक्रम विद्यापीठाने केला असून लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी १२४ गुण देण्याची किमया विद्यापीठाने केली आहे.आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सध्याचे कामकाज अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध होत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. विशेषत: परीक्षा विभागाने अनेक बदल करीत परीक्षा आणि निकाल यंत्रणेतील त्रुटी दूर करून बिनचूक कामकाज सुरू केल्याचा छातीठोक दावा परीक्षा नियंत्रकांकडून वारंवार केला जातो; मात्र एमबीबीएस प्रथम वर्ष निकालातील एका गुणपत्रकामुळे परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बायो केमेस्ट्री या विषयात २०० पैकी २०५ गुण गुणपत्रिकेत दर्शविण्यात आले आहेत. शिवाय लेखी परीक्षेतही संबंधित विद्यार्थ्याला १०० पैकी चक्क १२४ गुण देऊन विद्यापीठाने कळसच केला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सदर बाब संबंधित विद्यार्थ्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने विद्यापीठाकडे त्याबाबतची तक्रार केल्यानंतर विद्यापीठ खडबडून जागे झाले. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संबंधितांनी दुरुस्ती करून त्यास सुधारित गुणपत्रक बहाल केले; मात्र या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, अशी तंबीच संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयादेखील दिल्याचे समजते.सुधारित गुणपत्रकामध्ये विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १०० पैकी ७५ आणि एकूण गुण दोनशे पैकी १५६ गुण देण्यात येऊन दुरुस्ती करण्यात आली; मात्र हा सर्व अनागोंदी प्रकार केवळ एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नसून काही विद्यार्थ्यांच्या निकालातही असा प्रकार घडल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठाच्या वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना या प्रकरणाविषयी चर्चा न करण्याचे फर्मान सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंत्रणेतील सुधारणेबाबत कितीही दावे केले जात असले तरी परीक्षेतील गोंधळाचे प्रकार सुरूच असून प्रॅक्टिकल्सच्या गुणांचा घोळ आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबाबत विद्यापीठाला अद्यापही यश आलेले नाही.