शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पंचवटीसह २० रेल्वेगाड्या १० मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० ...

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत रद्द केल्या आहेत.

पंचवटीने दररोज मुंबई, ठाण्याला कामानिमित्त व व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून शेकडो जण जातात. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवेची आस्थापनावगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातदेखील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसची गर्दी कमी झाली आहे. पंचवटीप्रमाणेच राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वेनादेखील गर्दी कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने १० मेपर्यंत या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार आहे.

नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-मुंबई दुरांतो या गाड्या नाशिकला थांबत नसल्यातरी त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून पंचवटी व अन्य इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू झाल्या. तथापी, सुरू झाल्यापासूनच पंचवटीला प्रतिसाद खूप कमी प्रमाणात मिळत होता. स्पेशल ट्रेनमुळे या गाडीचे भाडेही वाढले होते तसेच आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी, पासधारक वैतागले आहेत. गाडी येण्याआधी ९० मिनिटे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी कसारा लोकल, खासगी वाहनांनी मुंबई गाठणे पसंत केले आहे. त्यामुळे गाडीचा प्रतिसाद कमी झाला आहे.