शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

पंचवटीसह २० रेल्वेगाड्या १० मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० ...

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत रद्द केल्या आहेत.

पंचवटीने दररोज मुंबई, ठाण्याला कामानिमित्त व व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून शेकडो जण जातात. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवेची आस्थापनावगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातदेखील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसची गर्दी कमी झाली आहे. पंचवटीप्रमाणेच राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वेनादेखील गर्दी कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने १० मेपर्यंत या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार आहे.

नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-मुंबई दुरांतो या गाड्या नाशिकला थांबत नसल्यातरी त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून पंचवटी व अन्य इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू झाल्या. तथापी, सुरू झाल्यापासूनच पंचवटीला प्रतिसाद खूप कमी प्रमाणात मिळत होता. स्पेशल ट्रेनमुळे या गाडीचे भाडेही वाढले होते तसेच आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी, पासधारक वैतागले आहेत. गाडी येण्याआधी ९० मिनिटे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी कसारा लोकल, खासगी वाहनांनी मुंबई गाठणे पसंत केले आहे. त्यामुळे गाडीचा प्रतिसाद कमी झाला आहे.