शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

पंचवटीसह २० रेल्वेगाड्या १० मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० ...

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत रद्द केल्या आहेत.

पंचवटीने दररोज मुंबई, ठाण्याला कामानिमित्त व व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून शेकडो जण जातात. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवेची आस्थापनावगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातदेखील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसची गर्दी कमी झाली आहे. पंचवटीप्रमाणेच राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वेनादेखील गर्दी कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने १० मेपर्यंत या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार आहे.

नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-मुंबई दुरांतो या गाड्या नाशिकला थांबत नसल्यातरी त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून पंचवटी व अन्य इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू झाल्या. तथापी, सुरू झाल्यापासूनच पंचवटीला प्रतिसाद खूप कमी प्रमाणात मिळत होता. स्पेशल ट्रेनमुळे या गाडीचे भाडेही वाढले होते तसेच आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी, पासधारक वैतागले आहेत. गाडी येण्याआधी ९० मिनिटे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी कसारा लोकल, खासगी वाहनांनी मुंबई गाठणे पसंत केले आहे. त्यामुळे गाडीचा प्रतिसाद कमी झाला आहे.