शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

२० कुटुंबे उघड्यावर

By admin | Updated: January 9, 2016 22:53 IST

त्र्यंबकेश्वर : अतिक्रमण निर्मूलन मोहीम

त्र्यंबकेश्वर : ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या रस्त्याच्या कडेला वन विभागाच्या हद्दीत असलेली व या विभागाने अतिक्रमित म्हणून ठरविलेली दुकाने व तात्पुरती वसतिस्थाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केली. त्यामुळे सुमारे वीस कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यामुळे विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.ब्रह्मगिरी व गंगाद्वार म्हणजे त्र्यंबकेश्वरचे भूषण मानले जाते. लाखो भाविक या दोन्ही पहाडांवर येतात. तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गर्दी करतात. ब्रह्मगिरीचे मुख्य स्थान म्हणजे गोदावरीचे उगमस्थान पाहण्यासाठी लोक येतात. अशा या पहाडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेकांनी वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. ब्रह्मगिरी व गंगाद्वारला जाण्याच्या वाटेवर अनेकांनी लिंबू सरबत, थंड पेये, पाण्याच्या बाटल्या, भेळभत्ता आदिंची दुकाने मांडली आहेत. माकडांसाठी चणे फुटाणे विकले जातात. काठीचा पायऱ्या चढण्यासाठीही उपयोग होतो. वास्तविक उदरनिर्वाहासाठी राहणाऱ्या लोकांनी तेथे जागा बळकावून शेती केली नाही की पक्की सीमेंटची घरे बांधली नाहीत. कुडाचे व प्लॅस्टिकच्या भिंती व वरती पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून पत्रे असा त्यांचा प्रपंच आहे; मात्र याचा कोणताही विचार न करता अतिक्रमणे पाडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.