शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

१४ ग्रामपंचायती अस्तित्वात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:16 IST

कळवण : विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.

ठळक मुद्देकळवणच्या पाच, तर सुरगाण्यातील दोन ग्रामपंचायतींचे होणार विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत.जिल्हा परिषदेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील ज्या आदिवासी गावांची लोकसंख्या एक हजारांहून अधिक असूनदेखील त्या गावांचा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. त्यामुळे आदिवासी गावे विकासापासून वंचित असल्याची ओरड होत होती. या गावातील आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत विभाजनाची मागणी केली होती. शासन नियमानुसार पात्र असलेल्या गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येते. ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापासून विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती केली जात असल्यामुळे कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत आमदार नितीन पवार यांनी नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना केली होती.कळवण व सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने १४ ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामपंचायतींच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.या ग्रामपंचायतींचे होणार विभाजनकळवण तालुक्यातील पिंपळे बुद्रुकमधून सावरपाडा, मळगाव खुर्दमधून मळगाव बुद्रुक; दरेभणगीमधून धनेर दिगर; वाडी बुद्रुकमधून एकलहरे; नाळीद ग्रामपंचायतीतून भांडणे (पिंपळे) व इन्शी या दोन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या ग्रुप ग्रामपंचायतीतून चंद्रपूर, चिंचले, पांगारणे, सोनगीर, उदमाळ या नवीन; तर हट्टी ग्रामपंचायतीतून करवंदे, श्रीभुवन, मोठा माळ या तीन नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत