शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१९ फेब्रुवारीलाच खरी शिवजयंती

By admin | Updated: March 8, 2017 00:24 IST

नाशिक : राज्य सरकारने समिती गठीत करून निश्चित केलेली १९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख असून, दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शासनाने निश्चित केलेलीच शिवजयंती खरी आहे.

नाशिक : राज्य सरकारने समिती गठीत करून निश्चित केलेली १९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख असून, दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शासनाने निश्चित केलेलीच शिवजयंती खरी असून, सरकारच्या निर्णयाची पायमल्ली करून काही पक्ष, संस्था व संघटना जन्मतारखेचा वाद निर्माण करून १५ मार्च रोजी शिवजयंती साजरी करीत असल्याने अशा शिवजयंतीस परवानगी देऊ नये, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद मिटावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक यांच्या काळात १९६६ साली समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित करण्यात आली होती. शिवसेना व भाजप युतीच्या कालखंडात मांडल्या गेलेल्या या सूचनेला सेनेचे चंद्रकांत पडवळ, रवींद्र गायकवाड, कॉँग्रेसमधून इतिहासाचे प्राध्यापक सुहेल लोखंडवाला, माणिकराव ठाकरे, भाजपाच्या रूपलेखा ढोरे यांनी पाठिंबा दिला होता.  अधिवेशन काळात यावर अंतिम निर्णय होण्याअगोदर सेना-भाजपने विधानसभा बरखास्त केली व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात दोन्ही कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यावर  कॉँग्रेस सरकारने आश्वासनाची पूर्तता केली व १३ मार्च २००० रोजी राज्यपालांनी आपल्या  भाषणात फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख राज्य सरकारने स्वीकारली असून, आता यापुढे प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी केली जाईल असे सांगितले होते.  मात्र सन २००० मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यावर सेना,  भाजपाने राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची थट्टा सुरू केली ती आजतागायत चालूच आहे.  कालनिर्णयसारख्या बहुतांश दिनदर्शिकाही सरकारच्या या निर्णयाची पायमल्ली करीत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना हे निवेदन देण्यात आले. त्यावर संतोष गायधनी, संतोष माळोदे, मधुकर कासार, विकास भागवत, अस्मिता देशमाने, माधवी पाटील, ललिता गोवर्धने आदिंची नावे आहेत. (प्रतिनिधी)