शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:26 IST

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देबागलाण, नांदगावला मिळाले पूर्णवेळ तहसीलदार

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे.नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती. मध्यंतरी त्यांच्याकडून अर्धन्यायिक कामकाज काढून घेत पंख छाटण्यात आले होते. शिवाय त्यांच्या बदलीसाठी अन्य इच्छुक तहसीलदारांप्रमाणेच खुद्द जिल्हाधिकारीदेखील उत्सुक असल्याची चर्चा कायमच रंगत होती. या बदल्यांमध्ये गेल्या मे महिन्यात बागलाण तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेल्या वंदना खरमाळे यांची अखेर इगतपुरीत नेमणूक करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या बागलाणसाठी नंदुरबारहून प्रमोद हिले यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर इगतपुरीचे अनिल पुरे यांची नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांची विभागीय आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. नांदगाव तहसीलदारपदी पारनेरच्या भारती अण्णासाहेब सगरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकरोडच्या महसूल प्रबोधिनीच्या अर्चना खेतमाळीस यांची एरंडोल येथे, तर विभागीय आयुक्तालयातील मंजूषा घाडगे यांची महसूल प्रबोधिनी येथे बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे दत्तात्रय शेजूळ यांची देवळा तहसीलदार म्हणून, तर देवळ्याचे कैलास पवार यांची नगरला बदली झाली आहे. येवल्याचे नरेशकुमार बहिरम यांची पिंपळनेर -साक्रीला बदली झाली असून, त्यांच्या जागी दोंडाईचा येथील रोहिदास वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरच्या रचना पवार यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये नाशिक विभागातील १९ तहसीलदारांचा समावेश असून, या सर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे, असे शाासनाचे आदेश आहेत.हस्तक्षेपाचा आरोप खरागेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या बागलाण व नांदगाव या तालुक्यालादेखील या बदल्यांमध्ये पूर्णवेळ तहसीलदार मिळाला आहे. विशेष म्हणजे बागलाणच्या तहसीलदारांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यानिमित्ताने खरा ठरला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारTransferबदली