शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:37 IST

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.

ठळक मुद्देवीज कंपनीची निविदा जाहीर : एचव्हीडीएसमधून होणार २४८ कोटींची कामे

नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रि येला सुरु वात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणाºया ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून जिल्ह्णात २४८ कोटी रु पये किमतीच्या कामातून जवळपास १८ हजार शेतकºयांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.मार्च-२०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे जोडणी देण्याची योजना आहे. या योजनेतून नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतकºयांना थेट फायदा होणार आहे, तर परिसरातील इतर शेतकºयांनाही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळणार आहे. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवॉटचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार आहेत.परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवॉटच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. या व्यतिरिक्त आकडे टाकून चोºया करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र जळण्याचे होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीज वितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होते.उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व याप्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीजजोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरु स्त होण्याच्या तक्र ारी दूर होतील, योग्य दाबाने वीजपुरवठा शक्य होणार आहे.पहिले फिरते बिल भरणा केंद्रग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली आहे. -वृत्त - पान ४पंधरा महिन्यांचे ‘लक्ष्य’येत्या पंधरा महिन्यांच्या आत या योजनेतील कामे संपविण्याबाबत सूचना आहेत. शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहर मंडळ कार्यालयांतर्गत ८६ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या २५ कामांची निविदा काढण्यात आली आहे. यातून सहा हजार ३२ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे, तर मालेगाव मंडळ कार्यालयांतर्गत १६१ कोटी ८८ लाख रु पये किमतीच्या ३४ कामाची निविदा काढण्यात आली असून, यातून ११ हजार ६६१ शेतरकºयांना वीजजोडणी मिळणार आहे.