शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

१८ धरणे ओव्हरफ्लो : सहा वर्षांनंतर वाघदर्डी फुल्ल

By admin | Updated: October 5, 2016 01:05 IST

नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

नाशिक : यंदा पावसाने लावलेल्या समाधानकारक हजेरीने नद्या, नाल्यांना पूर येण्याबरोबरच धरणेही हाऊसफुल्ल झाली असून, परतीच्या पावसाने दिलेल्या अचानक दणक्याने धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मनमाडनजीकचे वागदर्डी धरण दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागले आहे. परतीच्या पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्यानंतर मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली, तत्पूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत निफाड, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने त्याचा फटका शेतातील उभ्या पिकांना तर बसलाच, परंतु कांद्याचेही नुकसान झाले. छाटणीवर आलेल्या द्राक्षबागांवरही या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत दि. १ ते ४ आॅक्टोबर या चार दिवसांतच ५५ टक्के पाऊस पडला आहे. तर नाशिक, दिंडोरी, पेठ, मालेगाव, नांदगाव, बागलाण, सिन्नर या तालुक्यामध्ये आॅक्टोबरची सरासरी ओलांडून शंभर टक्क्यापेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. सप्टेंबर अखेर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के पाऊस जिल्ह्यात नोंदविला गेला असताना, आॅक्टोबरच्या चार दिवसांतच जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांनंतरचा हा विक्रम आहे. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले असून, हा अहवाल आल्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणी साठले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे व अजूनही परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे जिल्ह्यातील अठरा लहान व मध्यम धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे. १८ धरणे शंभर टक्के भरल्यामुळे त्यांची क्षमता संपुष्टात आल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. मनमाडनजीकचे वाघदर्डी धरण गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यामुळे मनमाड शहर व रेल्वेचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)