शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाच महिन्यांत १६ खून !

By admin | Updated: June 2, 2017 01:30 IST

विजय मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

 विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यातच पंचवटीतील किरण निकमच्या खुनानंतर शहरात टोळीयुद्ध सुरू झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा दुसरी खुनाची घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली जात आहे़ पोलीस आयुक्तांनी सामाजिक उपक्रम अवश्य राबवावेत, परंतु त्याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अन् गुन्हेगारी मुक्त अभियान सुरू करावे, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे़पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ या जागी आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना अजूनही शहराचा अभ्यास झालेला नाही की खबरे व कर्तव्यात ते कमी पडतात अशी परिस्थिती आहे़ शहरात कधीतरी नावालाच नाकाबंदी, आॅलआउट, कोम्बिंग आॅपरेशन सुरू असले तरी गुन्हेगारांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही़ त्याचा फारसा उपयोग झालेला नाही़ शहर वाहतूक शाखा महसूल गोळा करण्यासाठी सुसाट झाली असून, पाच महिन्यात एकही चेनस्नॅचर सापडला नसला तरी एक कोटीहून अधिक महसूल मात्र त्यांनी गोळा केला आहे़पंचवटी परिसर गुन्हेगारी टोळी निर्मितीचे केंद्र व गुन्हेगाराचे आश्रयस्थानच बनले आहे़ शहरातील बहुतेक खून व टोळीयुद्धाचे धागेदोरे पंचवटीत येऊन थांबतात़ पूर्ववैमनस्यातून विधिसंघर्षित पाप्या शेरगीलचा पेठरोडवर भरदिवसा खून करण्यात आला़ यानंतर पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दीपक अहिरे हा हमाल, सराईत गुन्हेगार अजित खिच्ची यांचा टोळक्याने खून केला़ तर पंचवटीतील नरोत्तम भुवन येथे रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर झोपलेल्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या संशयितांचा पोलिसांना शोध लागलेला नाही़पंचवटीतील पाथरवट लेन व म्हसरूळ परिसरात टोळक्याने धारदार शस्त्रे फिरवून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली होती़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला किरण निकम या युवकाची नवनाथनगरमध्ये खून करण्यात आला़ या खुनाचा बदला घेण्यासाठी पंचवटी परिसरातील काही गुन्हेगारांनी उपनगरला मामाकडे आलेला तुषार साबळे याचा केवळ चेहरा साधर्म्यामुळे गोळ्या झाडून शस्त्रास्त्राने वार करून खून केला़ एकंदरीतच शहरातील वाढत्या खुनाच्या, जिवे ठार मारण्याच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे़ त्यातच पंचवटीतील सराईत गुन्हेगारांच्या खूनसत्रामुळे नाशकात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यावर नियंत्रण आणण्याचे काम पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे़