शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पाच महिन्यांत १६ खून !

By admin | Updated: June 2, 2017 01:30 IST

विजय मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

 विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यातच पंचवटीतील किरण निकमच्या खुनानंतर शहरात टोळीयुद्ध सुरू झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा दुसरी खुनाची घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली जात आहे़ पोलीस आयुक्तांनी सामाजिक उपक्रम अवश्य राबवावेत, परंतु त्याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अन् गुन्हेगारी मुक्त अभियान सुरू करावे, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे़पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ या जागी आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना अजूनही शहराचा अभ्यास झालेला नाही की खबरे व कर्तव्यात ते कमी पडतात अशी परिस्थिती आहे़ शहरात कधीतरी नावालाच नाकाबंदी, आॅलआउट, कोम्बिंग आॅपरेशन सुरू असले तरी गुन्हेगारांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही़ त्याचा फारसा उपयोग झालेला नाही़ शहर वाहतूक शाखा महसूल गोळा करण्यासाठी सुसाट झाली असून, पाच महिन्यात एकही चेनस्नॅचर सापडला नसला तरी एक कोटीहून अधिक महसूल मात्र त्यांनी गोळा केला आहे़पंचवटी परिसर गुन्हेगारी टोळी निर्मितीचे केंद्र व गुन्हेगाराचे आश्रयस्थानच बनले आहे़ शहरातील बहुतेक खून व टोळीयुद्धाचे धागेदोरे पंचवटीत येऊन थांबतात़ पूर्ववैमनस्यातून विधिसंघर्षित पाप्या शेरगीलचा पेठरोडवर भरदिवसा खून करण्यात आला़ यानंतर पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दीपक अहिरे हा हमाल, सराईत गुन्हेगार अजित खिच्ची यांचा टोळक्याने खून केला़ तर पंचवटीतील नरोत्तम भुवन येथे रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर झोपलेल्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या संशयितांचा पोलिसांना शोध लागलेला नाही़पंचवटीतील पाथरवट लेन व म्हसरूळ परिसरात टोळक्याने धारदार शस्त्रे फिरवून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली होती़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला किरण निकम या युवकाची नवनाथनगरमध्ये खून करण्यात आला़ या खुनाचा बदला घेण्यासाठी पंचवटी परिसरातील काही गुन्हेगारांनी उपनगरला मामाकडे आलेला तुषार साबळे याचा केवळ चेहरा साधर्म्यामुळे गोळ्या झाडून शस्त्रास्त्राने वार करून खून केला़ एकंदरीतच शहरातील वाढत्या खुनाच्या, जिवे ठार मारण्याच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे़ त्यातच पंचवटीतील सराईत गुन्हेगारांच्या खूनसत्रामुळे नाशकात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यावर नियंत्रण आणण्याचे काम पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे़