शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार रोहित्रे बंद; ३५४ वाहिन्या नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून ...

नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. शहरात देखील दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, वाऱ्याची तीव्रता कमी होताच महाविरणकडून दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यात ४० वीज उपकेंद्रे प्रभावित झाली होती. त्यापैकी २७ उपकेंद्रे सुरू करण्यात आली. ३५४ वीज वाहिन्या बंद पडल्या. त्यापैकी १७१ सुरू झाल्या आहेत. १४,०६३ रोहित्रे बंद झाली होती, त्यापैकी ७,३१३ रोहित्रे सुरू करण्यात आली. उच्च व लघुदाबाचे एकूण १६३ खांब प्रभावित झाले, त्यापैकी ६७ सुरळीत करण्यात आले. उर्वरित बंद असलेली यंत्रणासुद्धा पूर्ववत करण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. वृत्त लिहिस्तोवर उर्वरित बंद असलेला बहुतांश भाग सुरू करण्यात आला होता.

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीज वाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवा हक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिक ग्रामीण तसेच शहरातही वादळामुळे वीज यंत्रणेला फटका बसला, वीज यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळल्याने अनेक वीज वाहिन्यांचा पुरवठा बंद पडला. अनेक वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला होता. चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे नुकसान झाले असून हे चक्रीवादळ राज्यात घोंघावत असून या वादळाचा सामना करण्यास महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.

--इन्फो--

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी २४ तास सुरू असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या तसेच नाशिक येथील नियंत्रण कक्षाचे ७८७५३५७८६१ आणि ७८७५७६६३५१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपल्या क्षेत्रातील महावितरणचे कक्ष कार्यालय व अभियंता यांना संपर्क करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

फोटो ओळ: अंबड येथे ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने वीज पुरवठा बंद पडला.