शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा खोऱ्यात १४ टक्के जलसाठा

By admin | Updated: September 6, 2015 22:22 IST

दुष्काळ : कसमादेचा पाणीप्रश्न गंभीर

मालेगााव : तालुक्यासह कळवण, बागलाण, चांदवड, नांदगाव, देवळा तालुका दुष्काळाच्या छायेत सापडला असून, या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा खोऱ्यात आॅगस्ट अखेर १४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न पडल्यास मोठा गंभीर प्रश्न उभा राहण्याची चिन्हे आहेत. येथील गिरणा खोरे त्रुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यातील भागात गिरणा नदीवर चणकापूर, पुनद व गिरणा हे तीन, तर मोसम नदीवर हरणबारी, आरम नदीवर केळझर, पांझण नदीवर नागासाक्या ही धरणे आहेत. यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाचा उपयुक्त साठा १८ हजार ५००, चणकापूरचा २ हजार ७१४, पुनदचा १ हजार ४०४, हरणबारीचा १ हजार १६६, तर नागासाक्या धरणाचा ३९७ असा एकूण २४ हजार ७५३ द.ल.घ.फू. उपयुक्त पाणीसाठा आहे. या सर्व धरणांत आॅगस्टअखेर ३४७३ द.ल.घ.फू. साठा होता. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ९६४७ फूट होता. त्याची २०१४-१५ची टक्केवारी ३९ होती. आॅगस्टअखेर यातील गिरणा धरणात ६४४, चणकापूरमध्ये १३८३, पुनदमध्ये ६३६, केळझरमध्ये १८८ द.ल.घ.फू. जलसाठा असून, नाग्यासाक्या धरण पूर्णपणे कोरडेठाक असल्याची माहिती आहे. यातील विशेष म्हणजे नाक्यासाक्या धरणात गेल्यावर्षी शून्य साठा होता. या धरणाची टक्केवारी अनुक्रमे ३, ५१, ४५, ५३, ३३ अशी आहे. मागील वर्षी ही टक्केवारी अनुक्रमे २७, ७९, ५४, १०० व ९३ अशी होती. यावरून पाण्याच्या स्थितीची कल्पना येते. परिसरात दिवसेंदिवस तपमानात वाढ होत असून, त्यामुळे या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असून, अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासून उपाय योजले जाणे गरजेचे आहे. कसमादेच्या हक्काचे असलेले पाणी काही वर्षांपूर्वी गोदावरी खोऱ्यात पळविण्यात आल्यावर येथील जनतेने व प्रतिनिधींनी त्याविरोधात आवाज न उठविल्याने मांजरपाडा धरणाचे पाणी तालुक्याबाहेर जाणार आहे. वास्तविक हे पाणी येथील जनतेच्या मालकीचे व त्यांच्यासाठीच राखीव होते; मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तसेच जनसामान्यांविषयी कळकळ नसल्याने गिरणा खोरे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत वावरत असून, येथील शेती उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)