शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा खोऱ्यात १४ टक्के जलसाठा

By admin | Updated: September 6, 2015 22:22 IST

दुष्काळ : कसमादेचा पाणीप्रश्न गंभीर

मालेगााव : तालुक्यासह कळवण, बागलाण, चांदवड, नांदगाव, देवळा तालुका दुष्काळाच्या छायेत सापडला असून, या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा खोऱ्यात आॅगस्ट अखेर १४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न पडल्यास मोठा गंभीर प्रश्न उभा राहण्याची चिन्हे आहेत. येथील गिरणा खोरे त्रुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यातील भागात गिरणा नदीवर चणकापूर, पुनद व गिरणा हे तीन, तर मोसम नदीवर हरणबारी, आरम नदीवर केळझर, पांझण नदीवर नागासाक्या ही धरणे आहेत. यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाचा उपयुक्त साठा १८ हजार ५००, चणकापूरचा २ हजार ७१४, पुनदचा १ हजार ४०४, हरणबारीचा १ हजार १६६, तर नागासाक्या धरणाचा ३९७ असा एकूण २४ हजार ७५३ द.ल.घ.फू. उपयुक्त पाणीसाठा आहे. या सर्व धरणांत आॅगस्टअखेर ३४७३ द.ल.घ.फू. साठा होता. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ९६४७ फूट होता. त्याची २०१४-१५ची टक्केवारी ३९ होती. आॅगस्टअखेर यातील गिरणा धरणात ६४४, चणकापूरमध्ये १३८३, पुनदमध्ये ६३६, केळझरमध्ये १८८ द.ल.घ.फू. जलसाठा असून, नाग्यासाक्या धरण पूर्णपणे कोरडेठाक असल्याची माहिती आहे. यातील विशेष म्हणजे नाक्यासाक्या धरणात गेल्यावर्षी शून्य साठा होता. या धरणाची टक्केवारी अनुक्रमे ३, ५१, ४५, ५३, ३३ अशी आहे. मागील वर्षी ही टक्केवारी अनुक्रमे २७, ७९, ५४, १०० व ९३ अशी होती. यावरून पाण्याच्या स्थितीची कल्पना येते. परिसरात दिवसेंदिवस तपमानात वाढ होत असून, त्यामुळे या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असून, अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासून उपाय योजले जाणे गरजेचे आहे. कसमादेच्या हक्काचे असलेले पाणी काही वर्षांपूर्वी गोदावरी खोऱ्यात पळविण्यात आल्यावर येथील जनतेने व प्रतिनिधींनी त्याविरोधात आवाज न उठविल्याने मांजरपाडा धरणाचे पाणी तालुक्याबाहेर जाणार आहे. वास्तविक हे पाणी येथील जनतेच्या मालकीचे व त्यांच्यासाठीच राखीव होते; मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तसेच जनसामान्यांविषयी कळकळ नसल्याने गिरणा खोरे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत वावरत असून, येथील शेती उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)