शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 29, 2015 23:34 IST

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

  नाशिक : उन्हाळ्याचा तडाखा वाढताच ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, येवला, सिन्नर, पेठ, सुरगाणा व नांदगाव या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची परिस्थितीत समाधानकारक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करीत असली तरी, गेल्या वर्षी सिन्नरला उघडकीस आलेला टॅँकर घोटाळा पाहून प्रशासनानेच टॅँकर मंजूर करताना हात अखडता घेतल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २८ मे २०१४ रोजी जिल्'ात १२२ गावे, २७२ वाड्यांना १२० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र १३२ गावे, २०२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे ३२२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यापर्यंत जिल्'ात अवकाळी पाऊस कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचा किंबहुना उशिराने टॅँकर सुरू करावे लागल्याचा दावा प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्याचा तडाखा मे महिन्याच्या प्रारंभापासूनच वाढल्याने अगोदरच तळ गाठलेल्या नद्या, नाल्यांबरोबर विहिरींमध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरशिवाय पर्यायच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काही गावे, वाड्यांना टॅँकर मंजूर करण्यात आले असले तरी, टॅँकर मंजूर करताना शासकीय यंत्रणा हात अखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून केल्या जात आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी टॅँकर घोटाळा उघडकीस आल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई बघता यंदा टॅँकर मंजूर करण्यास यंत्रणा अनुत्सुक आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयांवर पाण्यासाठी हंडा मोर्चे काढले जात आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आली आहेत. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास टॅँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकट==== तालुका निहाय टंचाई बागलाण - १५ गावे, ८ टॅँकर चांदवड - ११ गावे, ४ टॅँकर दिंडोरी - २ गावे, १ टॅँकर देवळा - १४ गावे, ७ टॅँकर इगतपुरी- ११ गावे, ५ टॅँकर मालेगाव - १ गाव, १ टॅँकर नांदगाव - ८१ गावे, ११ टॅँकर पेठ - ७ गावे, ३ टॅँकर सुरगाणा - ४८ गावे, ११ टॅँकर सिन्नर - ६८ गावे, १३ टॅँकर त्र्यंबक- २९ गावे, ७ टॅँकर येवला-४७, १५ टॅँकर