शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 29, 2015 23:34 IST

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

  नाशिक : उन्हाळ्याचा तडाखा वाढताच ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, येवला, सिन्नर, पेठ, सुरगाणा व नांदगाव या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची परिस्थितीत समाधानकारक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करीत असली तरी, गेल्या वर्षी सिन्नरला उघडकीस आलेला टॅँकर घोटाळा पाहून प्रशासनानेच टॅँकर मंजूर करताना हात अखडता घेतल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २८ मे २०१४ रोजी जिल्'ात १२२ गावे, २७२ वाड्यांना १२० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र १३२ गावे, २०२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे ३२२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यापर्यंत जिल्'ात अवकाळी पाऊस कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचा किंबहुना उशिराने टॅँकर सुरू करावे लागल्याचा दावा प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्याचा तडाखा मे महिन्याच्या प्रारंभापासूनच वाढल्याने अगोदरच तळ गाठलेल्या नद्या, नाल्यांबरोबर विहिरींमध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरशिवाय पर्यायच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काही गावे, वाड्यांना टॅँकर मंजूर करण्यात आले असले तरी, टॅँकर मंजूर करताना शासकीय यंत्रणा हात अखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून केल्या जात आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी टॅँकर घोटाळा उघडकीस आल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई बघता यंदा टॅँकर मंजूर करण्यास यंत्रणा अनुत्सुक आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयांवर पाण्यासाठी हंडा मोर्चे काढले जात आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आली आहेत. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास टॅँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकट==== तालुका निहाय टंचाई बागलाण - १५ गावे, ८ टॅँकर चांदवड - ११ गावे, ४ टॅँकर दिंडोरी - २ गावे, १ टॅँकर देवळा - १४ गावे, ७ टॅँकर इगतपुरी- ११ गावे, ५ टॅँकर मालेगाव - १ गाव, १ टॅँकर नांदगाव - ८१ गावे, ११ टॅँकर पेठ - ७ गावे, ३ टॅँकर सुरगाणा - ४८ गावे, ११ टॅँकर सिन्नर - ६८ गावे, १३ टॅँकर त्र्यंबक- २९ गावे, ७ टॅँकर येवला-४७, १५ टॅँकर