शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 29, 2015 23:34 IST

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

  नाशिक : उन्हाळ्याचा तडाखा वाढताच ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, येवला, सिन्नर, पेठ, सुरगाणा व नांदगाव या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची परिस्थितीत समाधानकारक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करीत असली तरी, गेल्या वर्षी सिन्नरला उघडकीस आलेला टॅँकर घोटाळा पाहून प्रशासनानेच टॅँकर मंजूर करताना हात अखडता घेतल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २८ मे २०१४ रोजी जिल्'ात १२२ गावे, २७२ वाड्यांना १२० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र १३२ गावे, २०२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे ३२२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यापर्यंत जिल्'ात अवकाळी पाऊस कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचा किंबहुना उशिराने टॅँकर सुरू करावे लागल्याचा दावा प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्याचा तडाखा मे महिन्याच्या प्रारंभापासूनच वाढल्याने अगोदरच तळ गाठलेल्या नद्या, नाल्यांबरोबर विहिरींमध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरशिवाय पर्यायच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काही गावे, वाड्यांना टॅँकर मंजूर करण्यात आले असले तरी, टॅँकर मंजूर करताना शासकीय यंत्रणा हात अखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून केल्या जात आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी टॅँकर घोटाळा उघडकीस आल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई बघता यंदा टॅँकर मंजूर करण्यास यंत्रणा अनुत्सुक आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयांवर पाण्यासाठी हंडा मोर्चे काढले जात आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आली आहेत. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास टॅँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकट==== तालुका निहाय टंचाई बागलाण - १५ गावे, ८ टॅँकर चांदवड - ११ गावे, ४ टॅँकर दिंडोरी - २ गावे, १ टॅँकर देवळा - १४ गावे, ७ टॅँकर इगतपुरी- ११ गावे, ५ टॅँकर मालेगाव - १ गाव, १ टॅँकर नांदगाव - ८१ गावे, ११ टॅँकर पेठ - ७ गावे, ३ टॅँकर सुरगाणा - ४८ गावे, ११ टॅँकर सिन्नर - ६८ गावे, १३ टॅँकर त्र्यंबक- २९ गावे, ७ टॅँकर येवला-४७, १५ टॅँकर