शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 29, 2015 23:37 IST

टॅँकरने गाठली नव्वदी गंगापूर वगळता धरणांमध्ये १३ टक्के पाणीसाठा

  नाशिक : उन्हाळ्याचा तडाखा वाढताच ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, येवला, सिन्नर, पेठ, सुरगाणा व नांदगाव या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची परिस्थितीत समाधानकारक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करीत असली तरी, गेल्या वर्षी सिन्नरला उघडकीस आलेला टॅँकर घोटाळा पाहून प्रशासनानेच टॅँकर मंजूर करताना हात अखडता घेतल्याची तक्रार केली जात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २८ मे २०१४ रोजी जिल्'ात १२२ गावे, २७२ वाड्यांना १२० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र १३२ गावे, २०२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे ३२२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यापर्यंत जिल्'ात अवकाळी पाऊस कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचा किंबहुना उशिराने टॅँकर सुरू करावे लागल्याचा दावा प्रशासन करीत आहे. प्रत्यक्षात उन्हाळ्याचा तडाखा मे महिन्याच्या प्रारंभापासूनच वाढल्याने अगोदरच तळ गाठलेल्या नद्या, नाल्यांबरोबर विहिरींमध्येही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरशिवाय पर्यायच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत काही गावे, वाड्यांना टॅँकर मंजूर करण्यात आले असले तरी, टॅँकर मंजूर करताना शासकीय यंत्रणा हात अखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून केल्या जात आहे. विशेष करून सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी टॅँकर घोटाळा उघडकीस आल्याने शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई बघता यंदा टॅँकर मंजूर करण्यास यंत्रणा अनुत्सुक आहे. त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयांवर पाण्यासाठी हंडा मोर्चे काढले जात आहेत, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आली आहेत. उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास टॅँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकट==== तालुका निहाय टंचाई बागलाण - १५ गावे, ८ टॅँकर चांदवड - ११ गावे, ४ टॅँकर दिंडोरी - २ गावे, १ टॅँकर देवळा - १४ गावे, ७ टॅँकर इगतपुरी- ११ गावे, ५ टॅँकर मालेगाव - १ गाव, १ टॅँकर नांदगाव - ८१ गावे, ११ टॅँकर पेठ - ७ गावे, ३ टॅँकर सुरगाणा - ४८ गावे, ११ टॅँकर सिन्नर - ६८ गावे, १३ टॅँकर त्र्यंबक- २९ गावे, ७ टॅँकर येवला-४७, १५ टॅँकर