शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१३ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप

By admin | Updated: January 5, 2016 23:35 IST

सोनेवाडी : तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी (भोजापूर) येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात सुमारे १३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप सोनेवाडी येथील सत्ताधारी गटाचे सुधीर रावले, सरपंच आशा रावले व उपसरपंच मंदाकिनी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने विविध विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहार केला असून, माहितीच्या अधिकारात सर्व प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या मासिक बैठकीत मागील कामांचा आढावा घेताना ग्रामसेवक पी. एस. काशिद यांच्याकडे कार्यालयीन दप्तराची मागणी केली असता, दप्तर आॅडिटला गेले असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, वारंवार मागणी करूनही दप्तर देण्याबाबत काशिद यांनी चालढकल केली. त्यानंतर रावले यांनी माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली. तेव्हा विविध खात्यांवर निधीचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली. सरपंच व उपसरपंच यांनी मासिक बैठकीत ग्रामसेवक काशिद यांच्याकडे चेक बुक, कॅश बुक व पासबुकची मागणी केली असता, त्यांनी सादर केले नाही व अचानक एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निघून गेले असल्याचे रावले यांनी सांगितले. गेली पाच वर्षे प्रमिला लहानू सहाणे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. मात्र, त्यांचे पती लहानू दामोधर सहाणे यांनी चेक, प्रस्ताव, ठराव यावर बनावट सह्या करून गैरव्यवहार केला असल्याचा आरोप रावले यांनी पत्रकार परिषदेत केला. सन २०१३-१४ या वर्षात गावात पर्यावरण व ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत स्वच्छतागृह कचराकुंड्या व ट्री गार्डसाठी सुमारे ९१ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गावात एकही स्वच्छतागृह नाही. केवळ पाच कचराकुंड्या दिसत असल्या तरी एकही ट्री गार्ड गावात सापडले नसल्याचे रावले यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात वरील वस्तू खरेदी न करता केवळ बिले दाखवून रक्कम काढून घेण्यात आल्याचा आरोप रावले यांनी केला आहे. मुरुम टाकणे, घनकचरा व्यवस्थापन प्रचार व प्रसार, रस्ता कॉँक्रिटीकरण दुरुस्ती, सौरदीप, संगणक दुरुस्ती, रस्ता दुरुस्ती, रोपवाटिका आदि कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. खर्च आणि दप्तरातील नोंदी याचा कोठेही ताळमेळ दिसत नसून, अनेक ठिकाणी खर्चाच्या नोंदी नाही. गावात अद्याप ११३ कुटुंबे शौचालयाविना आहेत. तरीही गाव हगणदारी मुक्त झाले असल्याचे ग्रामसेवक काशिद यांनी पंचायत समिती स्तरावर कळविले असल्याचे रावले यांनी यावेळी सांगितले. नळपाणीपुरवठा योजना, तेरावा वित्त आयोग, बांधकाम विभाग व विविध हेड यांच्या नावाखाली मागील पाच वर्षांच्या काळात मोठा गैरव्यवहार झाला असून, पंचायत समिती स्तरावरून प्रत्यक्ष कामाची पाहणी, मूल्यांकन व एम. बी. रेकॉर्ड याबाबत काळजी घेतली असती तर असा प्रकार घडला नसता असेही रावले यांनी सांगितले. या सर्व कामांची तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, याबाबत वरिष्ठ पातळीवर निवेदन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विद्यमान ग्रामसेवक पी. एस. काशिद यांच्याशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला असता सद्यस्थितीत आपण याबाबत खुलासा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)