शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

१३ गाव पाणीपुरवठा योजनेत कृत्रिम टंचाई

By admin | Updated: August 21, 2016 01:06 IST

तक्रार : तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा

वडांगळी : वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मुबलक पाणी असतानाही त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने तीन ते चार दिवसआड पाणी मिळत असल्याची तक्रार मेंढी चे उपसरपंच सीताराम गिते यांनी केली आहे. मुबलक पाणी असूनही योजनेत समाविष्ट गावांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा गिते यांनी दिला आहे. सदर योजनेच्या देखरेखीसाठी कर्मचारी नाही. योजनेचा सर्व कारभार रामभरोसे सुरू असल्याचे गिते यांचे म्हणणे आहे. योजनेत समाविष्ट गावांना पाणी हवे असल्यास स्वत: सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याचे गिते यांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांच्याकडून उडावाउडवीचे उत्तरे दिले मिळत असल्याचे गिते यांनी पत्रकात म्हटले आहे. काही लोकप्रतिनिधींनी राजकीय प्रतिष्ठेपोटी सदर योजनेवर समिती गठित करण्यास विरोध केला होता. तसेच समिती गठीत करण्याच्यावेळी गटविकास अधिकारी हजर नसल्याचा आरोप गिते यांनी केला आहे. त्यामुळे आज या योजनेला मुबलक पाणी असतानाही पूर्व भागातील गावांना टंचाईला समोरे जावे लागत आहे. योजनेतील सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी उपाय योजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गिते यांनी दिला आहे. (वार्ताहर)