शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य शासनानेही महाराष्ट्र राज्य ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य शासनानेही महाराष्ट्र राज्य माध्यमित व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, सीईटीच्या माध्यमातून चांगले गुण मिळविण्याचा विश्वास नसलेल्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे पुढील प्रवेश कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

बारावीची परीक्षा रद्द झाली असली तरी त्याचा अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणावर फारसा फरक पडणार नाही. या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई व नीट यासारख्या, तर राज्य पातळीवर एमएचटीसीईटीसारख्या सामाईक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे प्रवेश घेणे शक्य होणार आहे. मात्र कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाणार, याकडे विद्यार्थी व पालकांसह शिक्षण संस्स्थांचेही लक्ष लागले आहे.

-- पॉईंटर -

जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी - ६७,९१८

मुले - ३६.६३४

मुली ३१,२८४

---

प्राचार्य म्हणतात...

विद्यार्थी म्हणतात... बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्यण विद्यार्थीहिताचाच आहे. परंतु, परीक्षा झाली नाही त्यामुळे पुढील प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांप्रमाणेच कला, वाणिज्य व विज्ञान पदवीसाठीही सामाईक प्रवेश परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- सागर जाधव , नाशिकरोड

वैद्यकीय व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होते. त्यामुळे परीक्षा रद्द झाली तरी या शाखांना प्रवेशाची अडचण येणार नाही. उर्वरित शाखांसाठी ज्याप्रमाणे नववीच्या ५० टक्के गुणांच्या आधारे दहावीचे मूल्यांकन होईल तसेच दहावीच्या आधारे बारावीचे मूल्यांकन करण्याचा पर्याय आहे.

- स्वाती डोंगरे, इंदिरानगर

---

पालक म्हणतात... कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने परीक्षा रद्द करण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. आता सीईटीपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उच्चशिक्षणाच्या जागाही वाढविण्याची गरज आहे.

- अंजली कदम, इंदिरानगर

शासनाने राज्यातील वैद्यकीय व तंत्रशिक्षण शाखांच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावेत यासाठी नियोजन करणे आ‌वश्यक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यांमध्ये जावे लागणार नाही.

- अविनाश पवार, उपनगर

-----

--- बारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना संबंधित शाखेतील पदवीसोबतच ५ वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील सीईटी द्यावी लागते.

- विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका, पदवी अभ्यासक्रम करता येतो. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचाही पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतो.

- फार्मसीमध्ये डी.फार्म. आणि बी. फार्म. असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

- गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर शाखेत करिअर करता येते. पदवीनंतर स्वत:चा व्यवसाय तसेच नोकरीचाही पर्याय उपलब्ध आहे.

- बारावीनंतर पॅरामेडिकल, पशुवैद्यकीय, बायोटेक्नॉलॉजी, बीएससी ॲग्री, फॅशन डिझाइन, संरक्षण दलातील एनडीए प्रवेश, फाइन आर्ट, बीसीए, बीबीए, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही असे विविध पर्याय खुले आहेत.