शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य शासनानेही महाराष्ट्र राज्य ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच राज्य शासनानेही महाराष्ट्र राज्य माध्यमित व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचा पालकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, सीईटीच्या माध्यमातून चांगले गुण मिळविण्याचा विश्वास नसलेल्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे पुढील प्रवेश कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

बारावीची परीक्षा रद्द झाली असली तरी त्याचा अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणावर फारसा फरक पडणार नाही. या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई व नीट यासारख्या, तर राज्य पातळीवर एमएचटीसीईटीसारख्या सामाईक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखांचे प्रवेश घेणे शक्य होणार आहे. मात्र कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाणार, याकडे विद्यार्थी व पालकांसह शिक्षण संस्स्थांचेही लक्ष लागले आहे.

-- पॉईंटर -

जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी - ६७,९१८

मुले - ३६.६३४

मुली ३१,२८४

---

प्राचार्य म्हणतात...

विद्यार्थी म्हणतात... बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्यण विद्यार्थीहिताचाच आहे. परंतु, परीक्षा झाली नाही त्यामुळे पुढील प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांप्रमाणेच कला, वाणिज्य व विज्ञान पदवीसाठीही सामाईक प्रवेश परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- सागर जाधव , नाशिकरोड

वैद्यकीय व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होते. त्यामुळे परीक्षा रद्द झाली तरी या शाखांना प्रवेशाची अडचण येणार नाही. उर्वरित शाखांसाठी ज्याप्रमाणे नववीच्या ५० टक्के गुणांच्या आधारे दहावीचे मूल्यांकन होईल तसेच दहावीच्या आधारे बारावीचे मूल्यांकन करण्याचा पर्याय आहे.

- स्वाती डोंगरे, इंदिरानगर

---

पालक म्हणतात... कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने परीक्षा रद्द करण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. आता सीईटीपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उच्चशिक्षणाच्या जागाही वाढविण्याची गरज आहे.

- अंजली कदम, इंदिरानगर

शासनाने राज्यातील वैद्यकीय व तंत्रशिक्षण शाखांच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावेत यासाठी नियोजन करणे आ‌वश्यक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरच्या राज्यांमध्ये जावे लागणार नाही.

- अविनाश पवार, उपनगर

-----

--- बारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना संबंधित शाखेतील पदवीसोबतच ५ वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील सीईटी द्यावी लागते.

- विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका, पदवी अभ्यासक्रम करता येतो. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचाही पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतो.

- फार्मसीमध्ये डी.फार्म. आणि बी. फार्म. असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

- गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर शाखेत करिअर करता येते. पदवीनंतर स्वत:चा व्यवसाय तसेच नोकरीचाही पर्याय उपलब्ध आहे.

- बारावीनंतर पॅरामेडिकल, पशुवैद्यकीय, बायोटेक्नॉलॉजी, बीएससी ॲग्री, फॅशन डिझाइन, संरक्षण दलातील एनडीए प्रवेश, फाइन आर्ट, बीसीए, बीबीए, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही असे विविध पर्याय खुले आहेत.