शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

जिल्ह्यात १२ हजार मतदार करणार पहिल्यांदाच मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या ...

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा काार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत. n लाेकमत न्यूज नेटवर्क

गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.

आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.

यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत.

--इन्फो--

अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा!

१) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे.

२) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे.