शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

नांदगाव प्रकरणी १२ जणांना हजेरीतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:30 IST

आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालयाने बारा शेतकºयांची हजेरीतून सुटका केली आहे.

नाशिक : आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालयाने बारा शेतकºयांची हजेरीतून सुटका केली आहे.दि. ५ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींना खरेदी-विक्रीची अनुमती दिल्याने शासनाच्या चार कोटी रुपयांचे नुकसान करून सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नांदगावचे तत्कालीन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व जमिनीचे मालक शेतकरी अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्णात सर्वच संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविला व नंतर न्यायालयाने तो कायमही केला. तथापि, या सर्व संशयितांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावून त्यांना तपास व चौकशीत सहकार्य करण्याची अट टाकली होती. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या गुन्ह्णाचा पुढे तपास केला नाही की, संशयितांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे अ‍ॅड. शिवाजी सानप, प्रशांत सानप यांच्यासह १२ शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हजेरीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी या गुन्ह्णातील फिर्यादी व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे हेदेखील उपस्थित होते. न्यायालयाने त्यांना दोषारोप दाखल केले काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी नकार दिला. त्यावर न्यायालयाने वादींचा अर्ज मंजूर करीत असल्याचे तोंडी सांगितले व तुमची काही हरकत आहे काय, असे विचारले असता भामरे यांनी नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने अ‍ॅड. शिवाजी सानप, हेमंत सानप, जयंतीभाई पटेल, भावीन पटेल, अर्जुन माकानी, शिवलाल माकांनी, विनोद माकांनी यांच्यासह १२ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावण्यापासून सूट दिली दिली आहे.