शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन औषध खरेदीत १२ लाखांचा घोटाळा

By admin | Updated: May 21, 2014 00:37 IST

साहित्य न घेताच दिले कंपन्यांना पैसे : तीन अधिकार्‍यांवर फौजदारी?

साहित्य न घेताच दिले कंपन्यांना पैसे : तीन अधिकार्‍यांवर फौजदारी?गणेश धुरीनाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील औषध व साहित्य खरेदीत तब्बल १२ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून, या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील खोडवे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या दोन अधिकार्‍यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आहे. औषधे व साहित्य न घेताच पुणे व मुंबईच्या तीन कंपन्यांना सुमारे १२ लाखांची देयके प्रदान केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरावरून त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात येऊन त्या समितीने चौकशी करून अहवालही राज्य आयुक्तांना सादर केला आहे. विद्यमान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी १२ मे २०१४ रोजीच गंभीर प्रतिनिवेदन सादर करून या प्रकरणी तिघा अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाईसंदर्भात मार्गदर्शन मागविल्याचे कळते. सन २०१२-१३ या वर्षात जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नाशिक यांची तांत्रिक मान्यता न घेताच ४९ लाख ५० हजारांची औषध व साहित्य खरेदी करण्यात येऊन त्यात अनियमितता झाल्याचे विभागाचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर २२ मार्च २०१२ व २९ जून २०१२ या दिवशी मुंबई व पुणेस्थित कंपन्यांना औषध खरेदीचे कार्यारंभ आदेश देऊन त्यांनी औषधे व साहित्य न पाठविताच त्यांना १२ लाख ९०२ रुपये अदा केल्याचे विभागाचे म्हणणे आहे. डॅफोडिल्स फार्मास्युटिकल कंपनीला एमपी सिरीज व पोक्झासिरीन (औषधे) पुरवठा करण्याचे आदेश असताना, पुरवठा न होताच त्यांना एक लाख ५० हजारांचे देयक अदा करण्यात आले. त्याचप्रमाणे एस. पी. एंटरप्राइजेसला शवविच्छेदन (पोस्टमार्टम) सेट अदा करावयाचा असताना, तो न मिळताही चार लाख ४० हजार व मे. ओम कॉपोरेशन, मुंबई या कंपनीला १ ते १८ साहित्याचा पुरवठा करणे अपेक्षित असताना तो न करताही सहा लाख सहा हजारांचे देयक अदा करण्यात आल्याचा ठपका पशुसंवर्धन विभागाने ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील खोडवे, डॉ. राजाराम चोेपडे व डॉ. डी. के. चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे कळते. त्यासंदर्भात अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त यांच्या ५ ऑगस्ट २०१३ च्या पत्रान्वये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. (प्रतिनिधी)