शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पेठ तालुक्यात १२ घरांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST

पेठ : आठवडाभरात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीसह घरांचेही नुकसान झाले असून, तालुक्यातील १२ कच्च्या घरांची पडझड होऊन साधारण ...

पेठ : आठवडाभरात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीसह घरांचेही नुकसान झाले असून, तालुक्यातील १२ कच्च्या घरांची पडझड होऊन साधारण ७२ हजारांचे नुकसान झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पुरातन गावतळे बुधवारच्या मुसळधार पावसात ओव्हरफ्लो झाले असून, या तलावातून पाणी बाहेर जाण्यासाठी तळमोरी नसल्याने तलावातून बाहेर पडणारे पाणी थेट परिसरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. नगरपंचायत प्रशासनाने या तलावाची पुनर्बांधणी करून ओव्हर फ्लो होणारे पाणी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे गावाच्या बाहेर सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

--------------------

कोटंबी घाटात संरक्षक जाळी बसविण्याची मागणी

पेठ ते नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर डोंगराच्या बाजूने दरड कोसळण्याच्या घटना वाढत असून, उत्तराच्या दिशेने येणारे दगड थेट रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून घाटात संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

----------------------

रस्त्यांची लागली वाट

मुसळधार पाऊस, नद्यांना आलेला पूर व घाट रस्त्यांमध्ये कोसळलेल्या दरडी यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून, अनेक ठिकाणी रस्तेच वाहून गेल्याने गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय डोंगरउतारावरून नागमोडी वळणे घेत तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यांसोबत वाडीवस्तीवर जाणारे रस्तेही मजबूत करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-------------------

पेठ तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरांचे झालेले नुकसान. (२४ पेठ १)

240721\24nsk_3_24072021_13.jpg

२४ पेठ १