शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

जिल्ह्यात दोन वर्षात ११३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ४२ प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ...

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ही पहिली घटना घडल्यानंतर आत्महत्येच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नाशिक जिल्हा देखील शेतकरी आत्महत्या घटनेस अपवाद नाही. गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर सन २०१९ मध्ये ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली, तर २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांची जीवन संपविले. यातील मयत शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आलेली असली तरी या प्रकरणात अपात्र ठरलेल्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याने त्यांना कष्टात जीवन जगावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये विषम प्रमाणात पर्जन्याची नेांद होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. काही भागात मुबलक पाऊस तर काही भाग दुष्काळी, कुठे अवकाळीचा फटका तर कुठे महापुरामुळे शेतामध्ये पाणी शिरल्याने झालेले नुकसान, निसर्गाची अवकृपा नेहमीच असल्याने शेतकऱ्यांपुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहातो. यातून शेतकरी कर्जबाजारी होतो आणि नैराश्यातून आत्महत्याही करताे. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या घटनेप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातही अनेक आत्महत्या घडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना गळ्याभोवती फास लावून आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात मात्र शासकीय मदतीअभावी त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होतांना दिसते.

सन २०१९ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६९ घटना घडल्या होत्या. शासनाकडे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण आर्थिक मदतीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यापैकी ४० प्रकरणे पात्र ठरली तर २९ प्रकरणे अपात्र ठरले आहेत. २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. त्यातील २९ शेतकऱ्यांचे वारस आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले तर १३ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले तरच आर्थिक मदतीसाठी प्रकरण पात्र ठरते. परंतु कोणतेही कर्ज नसेल किंवा शेती स्वत:ची नसेल तर आत्महत्येचे प्रकरण अपात्र ठरविले जाते. पात्र निकषात असेल्या प्रकरणांना शासनाकडून मदत दिली जाते. परंतु अपात्र राहिलेल्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

या दोन्ही वर्षी पात्र प्रकरणांना आर्थिक मदत देण्यात आली तर अपात्र प्रकरणे फेटाळ्यात आली आहेत. मागील वर्षीची केवळ २ प्रकरे हे प्रलंबित असून त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. इतर दाखल प्रकरणांमध्ये वारसांच्या खात्यात रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे. शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदतीची ३० टक्के रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाते तर ७० टक्के रकमेची गुंतवणूक केली जाते.