शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन वर्षात ११३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ४२ प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ...

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ही पहिली घटना घडल्यानंतर आत्महत्येच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नाशिक जिल्हा देखील शेतकरी आत्महत्या घटनेस अपवाद नाही. गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर सन २०१९ मध्ये ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली, तर २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांची जीवन संपविले. यातील मयत शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आलेली असली तरी या प्रकरणात अपात्र ठरलेल्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याने त्यांना कष्टात जीवन जगावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये विषम प्रमाणात पर्जन्याची नेांद होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. काही भागात मुबलक पाऊस तर काही भाग दुष्काळी, कुठे अवकाळीचा फटका तर कुठे महापुरामुळे शेतामध्ये पाणी शिरल्याने झालेले नुकसान, निसर्गाची अवकृपा नेहमीच असल्याने शेतकऱ्यांपुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहातो. यातून शेतकरी कर्जबाजारी होतो आणि नैराश्यातून आत्महत्याही करताे. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या घटनेप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातही अनेक आत्महत्या घडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना गळ्याभोवती फास लावून आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात मात्र शासकीय मदतीअभावी त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होतांना दिसते.

सन २०१९ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६९ घटना घडल्या होत्या. शासनाकडे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण आर्थिक मदतीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यापैकी ४० प्रकरणे पात्र ठरली तर २९ प्रकरणे अपात्र ठरले आहेत. २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. त्यातील २९ शेतकऱ्यांचे वारस आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले तर १३ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले तरच आर्थिक मदतीसाठी प्रकरण पात्र ठरते. परंतु कोणतेही कर्ज नसेल किंवा शेती स्वत:ची नसेल तर आत्महत्येचे प्रकरण अपात्र ठरविले जाते. पात्र निकषात असेल्या प्रकरणांना शासनाकडून मदत दिली जाते. परंतु अपात्र राहिलेल्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

या दोन्ही वर्षी पात्र प्रकरणांना आर्थिक मदत देण्यात आली तर अपात्र प्रकरणे फेटाळ्यात आली आहेत. मागील वर्षीची केवळ २ प्रकरे हे प्रलंबित असून त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. इतर दाखल प्रकरणांमध्ये वारसांच्या खात्यात रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे. शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदतीची ३० टक्के रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाते तर ७० टक्के रकमेची गुंतवणूक केली जाते.