शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन वर्षात ११३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ४२ प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ...

नाशिक: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या घटनेस १९ मार्च रोजी ३५ वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यातील ही पहिली घटना घडल्यानंतर आत्महत्येच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नाशिक जिल्हा देखील शेतकरी आत्महत्या घटनेस अपवाद नाही. गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर सन २०१९ मध्ये ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली, तर २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांची जीवन संपविले. यातील मयत शेतकऱ्याच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आलेली असली तरी या प्रकरणात अपात्र ठरलेल्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळालेली नसल्याने त्यांना कष्टात जीवन जगावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये विषम प्रमाणात पर्जन्याची नेांद होत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. काही भागात मुबलक पाऊस तर काही भाग दुष्काळी, कुठे अवकाळीचा फटका तर कुठे महापुरामुळे शेतामध्ये पाणी शिरल्याने झालेले नुकसान, निसर्गाची अवकृपा नेहमीच असल्याने शेतकऱ्यांपुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहातो. यातून शेतकरी कर्जबाजारी होतो आणि नैराश्यातून आत्महत्याही करताे. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या घटनेप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातही अनेक आत्महत्या घडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना गळ्याभोवती फास लावून आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात मात्र शासकीय मदतीअभावी त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होतांना दिसते.

सन २०१९ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ६९ घटना घडल्या होत्या. शासनाकडे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण आर्थिक मदतीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यापैकी ४० प्रकरणे पात्र ठरली तर २९ प्रकरणे अपात्र ठरले आहेत. २०२० मध्ये ४४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. त्यातील २९ शेतकऱ्यांचे वारस आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले तर १३ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले तरच आर्थिक मदतीसाठी प्रकरण पात्र ठरते. परंतु कोणतेही कर्ज नसेल किंवा शेती स्वत:ची नसेल तर आत्महत्येचे प्रकरण अपात्र ठरविले जाते. पात्र निकषात असेल्या प्रकरणांना शासनाकडून मदत दिली जाते. परंतु अपात्र राहिलेल्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

या दोन्ही वर्षी पात्र प्रकरणांना आर्थिक मदत देण्यात आली तर अपात्र प्रकरणे फेटाळ्यात आली आहेत. मागील वर्षीची केवळ २ प्रकरे हे प्रलंबित असून त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. इतर दाखल प्रकरणांमध्ये वारसांच्या खात्यात रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे. शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदतीची ३० टक्के रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाते तर ७० टक्के रकमेची गुंतवणूक केली जाते.