शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

कळवण तालुक्यातील १११ गावे सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST

संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्याच्या १११ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आजमितीस नाही. सरपंच ...

संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्याच्या १११ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आजमितीस नाही. सरपंच , उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून गावात शासनाच्या नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला, गावात वेळोवेळी धुरळणी व फवारणीदेखील करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले.कोरोना काळात गावात बाहेरच्या नागरिकांना प्रवेश बंद केला शिवाय आणि आठवडे बाजाराला मज्जाव केला, कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या व लॉकडाऊनमुळे गावात परतलेल्या रुग्णांची तपासणी करून ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात १११ गावात आजमितीस कोरोनाचा रुग्ण नाही. या गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. कोरोना रोखण्याबाबतच्या निर्देशांचे काटेकाेर पालन करण्यात आल्याने कोरोनाचे संक्रमण झालेले नाही. या गावातील नागरिकांनी विशेष प्रयत्न करुन कोरोना संक्रमण रोखले आहे. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती प्रशासन आणि संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,दक्ष गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. या गावांमध्ये आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती केली. ४१ गावात बाधित रुग्ण

कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, कनाशी, नवीबेज, मानूर, सप्तश्रृंगी गड, नांदुरी,मोकभणगी, रवळजी, शिरसमणी, कळवण खुर्द,पाटविहीर, पाळे बु, देवळी वणी, तिऱ्हळ खुर्द, खेडगाव, कातळगाव,पाळे पिंप्री, दळवट, भेंडी, भुसणी, जयपूर, आठंबे, निवाणे, हिंगवे, जयदर, वडाळा,निरगुडपाडा,चणकापूर, बिजोरे,पळसदर, सरलेदिगर,भादवन, पाळे खुर्द,देसराणे, जुनीबेज,गोपाळखडी, नाकोडे,बगडू या गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन या गावांमध्ये आज ४०९ रुग्ण कोरोना बाधित आहेत. कोट... कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी बाहेरगावी लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमास जाणेही टाळले. गावात अंत्यसंस्काराच्या वेळी आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत खडकी जयदर ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले होते. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.

- ललिता राजू खांडवी,

सरपंच खडकी जयदर

नियमांचे काटेकोर पालन

९५२ लोकसंख्या असलेल्या खडकी जयदर गावात नातेवाईकांव्यतिरिक्त बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे.गावातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेरगावी जातात;मात्र आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत असल्यामुळे गावात कोरोनाची लागण झाली नाही. मनात कोरोनाची भीती आहे. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करत ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली म्हणूनच गावात कोरोनाची एन्ट्री झाली नाही .

- मीना भोये,

ग्रामसेविका, खडकी जयदर

===Photopath===

050421\241805nsk_31_05042021_13.jpg~050421\241805nsk_32_05042021_13.jpg

===Caption===

मीना भोये~ललिता खांडवी