शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST

नाशिक: आर्थिक संकट आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कोरोनामुळे परिणाम झाला असला तरी या संकटाला धीराने तोंड ...

नाशिक: आर्थिक संकट आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कोरोनामुळे परिणाम झाला असला तरी या संकटाला धीराने तोंड देत काही शेतकरी सावरलेदेखील आहेत. मात्र गेल्या सात महिन्यांत अनेकविध कारणांनी अकरा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. मागील वर्षी जिल्ह्यात ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर यावर्षी जुलैअखेर ११ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असल्यातरी शेतकरी आत्महत्येच्या घटना काही प्रमाणात घडतच आहेत. नाशिक जिल्ह्यातही गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या अकरा घटना घडलेल्या असून, यातील बहुतेक सर्वच घटना या आदिवासी तालुक्यांमध्ये घडून आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार बागलाण तालुक्यात २, देवळा १, दिंडोरी २, मालेगाव १, निफाड ४ तर सुरगाणा येथे १ याप्रमाणे अकरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ५, फेब्रुवारी २, मार्च १, मे १, जून १ तर जुलै महिन्यात १ याप्रमाणे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत.

शासकीय नियमाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जात असून, शासनाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या निकषानुसार यातील चार प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले आहे, तर चार प्रकरणे शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाकडून मदत प्राप्त होताच त्यांना मदत दिली जाणार आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलून गेले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागालादेखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यंदा नाशिक ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव अधिक झाला असला तरी त्यातूनही अनेकांनी या संकटाचा धीराने सामना केला. त्यामुळे या काळातील घटना कमी आहेत.

--इन्फो--

मागील वर्षी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ४४ घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये ऑगस्ट २०२० मध्ये सर्वाधिक १० घटना घडलेल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये ८, तर डिसेंबरमध्ये ६ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी नाशिक, बागलाण, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, येवला आणि पेठ येथे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक १३ आत्महत्येच्या घटना घडल्या, त्यातील ३ अपात्र तर १० प्रकरणे पात्र ठरली.