शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

११९ अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 20, 2014 00:30 IST

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळ

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळनाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने जलसंपदा विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही जलसंपदा विभागाकडून अद्यापही नियुक्ती न देण्यात आल्याने सुमारे ११९ अभियंत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासून हे अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अद्यापही निवडप्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जलसंपदा विभागासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा गट-१ साठी २०१२ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०१३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे लोकसेवा आयोगाने शिफारसपात्र उमेदवारांची यादी १५ जून २०१३ रोजी जलसंपदा विभागाकडे पाठविली होती. आयोगाच्या पत्रानंतर या विभागाने लागलीच नियुक्तीप्रक्रिया सुरू केली; मात्र ही प्रक्रिया अद्यापही अंतिम टप्प्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पात्र उमेदवार नियुक्ती पत्राची वाट पाहत आहेत. आयोगाने पात्र उमेदवारांची यादी जलसंपदा विभागाला दिल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी, पोलीस तपासणीदेखील पूर्ण केलेली आहे. ही सर्व पूर्तता करीत असताना, महिनाभरात नियुक्ती दिली जाईल असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामा देऊन या नोकरीची अपेक्षा केली होती; परंतु आता वर्षभराचा काळ होत आला तरी एकाही उमेदवारास नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही. जलसंपदा विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि थांबलेली निवडप्रक्रिया यामुळे अनेक उमेदवारांना काय करावे असा प्रश्न पडला आहे. अगोदरच हातची नोकरी गेलेली, त्यातही नियुक्तीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने पात्रता असूनही अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे. तरी जलसंपदा विभागाने उमेदवार निवडीची पाऊले वेगाने उचलावीत, अशी आर्त मागणी या अभियंत्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी) या झाल्या आहेत प्रक्रिया... - २८ जुलै २०१३ - उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी.- ०८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पूर्ण. - १८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांकडून पसंती क्रमांक घेण्यात आला. - पोलीस व्हेरिफिकेशनदेखील पूर्ण. सहायक अभियंत्याची विभागनिहाय रिक्त पदेऔरंगाबाद - १५२नागपूर - ५२अमरावती - १०२कोंकण - ६८नाशिक - १४३पुणे - १६०