शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

११९ अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 20, 2014 00:30 IST

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळ

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळनाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने जलसंपदा विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही जलसंपदा विभागाकडून अद्यापही नियुक्ती न देण्यात आल्याने सुमारे ११९ अभियंत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासून हे अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अद्यापही निवडप्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जलसंपदा विभागासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा गट-१ साठी २०१२ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०१३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे लोकसेवा आयोगाने शिफारसपात्र उमेदवारांची यादी १५ जून २०१३ रोजी जलसंपदा विभागाकडे पाठविली होती. आयोगाच्या पत्रानंतर या विभागाने लागलीच नियुक्तीप्रक्रिया सुरू केली; मात्र ही प्रक्रिया अद्यापही अंतिम टप्प्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पात्र उमेदवार नियुक्ती पत्राची वाट पाहत आहेत. आयोगाने पात्र उमेदवारांची यादी जलसंपदा विभागाला दिल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी, पोलीस तपासणीदेखील पूर्ण केलेली आहे. ही सर्व पूर्तता करीत असताना, महिनाभरात नियुक्ती दिली जाईल असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामा देऊन या नोकरीची अपेक्षा केली होती; परंतु आता वर्षभराचा काळ होत आला तरी एकाही उमेदवारास नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही. जलसंपदा विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि थांबलेली निवडप्रक्रिया यामुळे अनेक उमेदवारांना काय करावे असा प्रश्न पडला आहे. अगोदरच हातची नोकरी गेलेली, त्यातही नियुक्तीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने पात्रता असूनही अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे. तरी जलसंपदा विभागाने उमेदवार निवडीची पाऊले वेगाने उचलावीत, अशी आर्त मागणी या अभियंत्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी) या झाल्या आहेत प्रक्रिया... - २८ जुलै २०१३ - उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी.- ०८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पूर्ण. - १८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांकडून पसंती क्रमांक घेण्यात आला. - पोलीस व्हेरिफिकेशनदेखील पूर्ण. सहायक अभियंत्याची विभागनिहाय रिक्त पदेऔरंगाबाद - १५२नागपूर - ५२अमरावती - १०२कोंकण - ६८नाशिक - १४३पुणे - १६०