शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी १०० कोटींची गरज

By admin | Updated: November 13, 2016 01:02 IST

वारकरी संप्रदाय : कुंभमेळ्यात मंदिर परिसर दुर्लक्षित राहिल्याचा आरोप

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केंद्र शासनाच्या तीर्थविकास योजनेअंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करून संपूर्ण मंदिराची काळ्यापाषाणात उभारणी करण्याबरोबरच येथे संतपीठ मंजूर व्हावे, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू व आद्यसद्गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांनी १६ जून १२९७मध्ये त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. या ठिकाणी त्यांचे पुरातन मंदिर आहे. साधारणत: तेराव्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरास सुमारे ७०० वर्षं पूर्ण झाली आहेत. पंढरपूरप्रमाणेच दरवर्षी पौष वारीला ३०० ते ४०० दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे ४ ते ५ लाख वारकरी श्री निवृत्तिनाथांच्या चरणी लीन होतात तर उटीच्या वारीला एक ते दीड लाख वारकरी येथे हजेरी लावत असतात. वारकऱ्यांबरोबरच राज्यभरातून लाखो भाविक संत निवृत्तिनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था ठेवताना संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानला तारेवरची कसरत करावी लागते. निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात भक्त निवास, संत निवास, वारकरी शिक्षण संस्था, ग्रंथालय, प्रसादालय, गोशाळा आणि मोफत रुग्ण सेवा आदि उपक्रमांसाठी संत मुक्ताबाई संस्थानप्रमाणे निवृत्तिनाथ संस्थानसाठी तीर्थविकास योजन ेअंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)