शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:25 IST

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने ...

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीत भरीव वाढ केली आहे.नाशिक जिल्ह्णात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता शासन निर्णयाने बळी पडणाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या, दुकट्या शेतकºयावर जीवघेणा हल्ला करून, लहान बालकांना पळवून नेणे, जनावरांचा फडशा पाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या वन्यप्राण्यांना अटकाव करण्याचे वन खात्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. बिबट्यांचे नित्याचेच दर्शन होऊन त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनुमती नागपूरस्थित वन खात्याकडून दिली जात असल्याने अशी परवानगी मिळण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटत आहे, परिणामी बिबट्यांशी दोन हात करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्यायच शिल्लक नसून, हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत वन खात्याविषयी व पर्यायाने सरकारबाबत रोष व्यक्त होत असताना शासनाने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानाकुत्रे यांच्य हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख व गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये वाढीव मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च शासन अदा करणार असून, त्याची मर्यादा २० हजारांपर्यंत असणार आहे.हिंस्रप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्केकिंवा ४० हजार रुपये, तर मेंढी, बकरी व इतर पशुधनासाठी दहा हजार रुपये मदत दिली जाईल. अपंगत्व आल्यास बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. मदतीची काही रक्कम रोख व उर्वरित रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे.