शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:25 IST

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने ...

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीत भरीव वाढ केली आहे.नाशिक जिल्ह्णात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता शासन निर्णयाने बळी पडणाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या, दुकट्या शेतकºयावर जीवघेणा हल्ला करून, लहान बालकांना पळवून नेणे, जनावरांचा फडशा पाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या वन्यप्राण्यांना अटकाव करण्याचे वन खात्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. बिबट्यांचे नित्याचेच दर्शन होऊन त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनुमती नागपूरस्थित वन खात्याकडून दिली जात असल्याने अशी परवानगी मिळण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटत आहे, परिणामी बिबट्यांशी दोन हात करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्यायच शिल्लक नसून, हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत वन खात्याविषयी व पर्यायाने सरकारबाबत रोष व्यक्त होत असताना शासनाने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानाकुत्रे यांच्य हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख व गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये वाढीव मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च शासन अदा करणार असून, त्याची मर्यादा २० हजारांपर्यंत असणार आहे.हिंस्रप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्केकिंवा ४० हजार रुपये, तर मेंढी, बकरी व इतर पशुधनासाठी दहा हजार रुपये मदत दिली जाईल. अपंगत्व आल्यास बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. मदतीची काही रक्कम रोख व उर्वरित रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे.