शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:25 IST

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने ...

नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीत भरीव वाढ केली आहे.नाशिक जिल्ह्णात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता शासन निर्णयाने बळी पडणाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या, दुकट्या शेतकºयावर जीवघेणा हल्ला करून, लहान बालकांना पळवून नेणे, जनावरांचा फडशा पाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या वन्यप्राण्यांना अटकाव करण्याचे वन खात्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. बिबट्यांचे नित्याचेच दर्शन होऊन त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनुमती नागपूरस्थित वन खात्याकडून दिली जात असल्याने अशी परवानगी मिळण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटत आहे, परिणामी बिबट्यांशी दोन हात करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्यायच शिल्लक नसून, हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत वन खात्याविषयी व पर्यायाने सरकारबाबत रोष व्यक्त होत असताना शासनाने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानाकुत्रे यांच्य हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख व गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये वाढीव मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च शासन अदा करणार असून, त्याची मर्यादा २० हजारांपर्यंत असणार आहे.हिंस्रप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्केकिंवा ४० हजार रुपये, तर मेंढी, बकरी व इतर पशुधनासाठी दहा हजार रुपये मदत दिली जाईल. अपंगत्व आल्यास बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. मदतीची काही रक्कम रोख व उर्वरित रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे.