शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

तब्बल ८ लाख मे. टन द्राक्षमाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 00:02 IST

कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देराज्यातील स्थिती : कोरोनाच्या फटक्याने निर्यात अवघड; उत्पादक आर्थिक अडचणीत

नाशिक : कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.द्राक्ष हंगाम बहरात असताना कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने द्राक्ष निर्यात बंद झाली. याबाबत सातत्याने झालेली ओरड आणि बळीराजाचे होणारे नुकसान पाहता संचारबंदीच्या काळात शेतमाल वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असली तरी परराज्यात अनेक अडचणी उभ्या ठाकत असल्याने उत्पादकांवरील संकट कायम आहे. सद्य:स्थितीत उत्पादक वाराणसी, कोलकाता यासारख्या शहरात द्राक्ष निर्यातीचा प्रयत्न करत असले तरी, ‘पॅकिंग’साठी संबंधित ठिकाणी मजूरच मिळत नाही, तर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनीहीपाठ फिरवल्याने माल पडून आहे. काही व्यापारी उत्साह दाखवितअसले तरी या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा खर्च वसूल होणे जिकिरीचे आहे. शिवाय के्रटमध्ये असाच माल पडून राहिल्यास द्राक्षांचे मणी गळून पडण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.निर्यातीचा हंगाम २० एप्रिलपर्यंत चालतो. या काळात राज्यभरातून सुमारे २००० कंटेनर इतका माल ठिकठिकाणी गेला असता, मात्र हंगामातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढणार कसे? असा प्रश्न उत्पादकांपुढे कायम आहे. त्यासाठी शासनानेच आता बळीराजाला न्याय देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.निसर्गानेही मारले...कोरोनाचे सावट कायम असताना राज्याच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसाने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले. या दुहेरी संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.गावोगावी विक्रीची परवानगी द्या...शेतमाल वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असली तरी निर्यातीचे संकट कायम आहे. संचारबंदीच्या काळात शासनाने द्राक्ष उत्पादकांना विशेष पास देऊन गावोगावी द्राक्ष विकता येतील अशी व्यवस्था करावी. त्यामुळे काहीसे नुकसान टाळता येईल, अशी मागणी निर्यातदार मधुकर ढोमसे यांनी केली आहे.कोरोना आणि निसर्गाच्या फटक्याने ‘मार्च एण्ड’नंतर बळीराजाचाच ‘एण्ड’ होतो का? अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाने आता महत्त्वाचा घटक समजल्या जाणाºया बळीराजाला हजारात मदत न करता लाखात मदत करून उभारी देणे अंत्यत महत्त्वाचे आहे.-जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, राज्य बागायतदार संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र