शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

जि.प.निवडणुकीची सेमी फायनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:59 IST

ग्रामपंचायत निवडणूक : प्रथमच दिसून आली सर्वच ठिकाणी राजकीय चूरस

नंदुरबार : येत काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व सेनेनेही चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. थेट सरपंचपदाची देखील निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त गावांवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रय} झाले. स्थानिक प्रश्न आणि राजकारणावरच ही निवडणूक लढविली गेली. असे असले तरी काँग्रेस व भाजपने दावे-प्रतिदावे केले आहेत. जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल गुरुवारी लागला. अनेक ठिकाणी निकालाचे गणित चुकले तर काही ठिकाणी अपेक्षीत निकाल लागले. थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्यामुळे सर्वच ठिकाणी चुरस देखील दिसून आली. असे असले तरी माघारीच्या वेळीच जवळपास 12 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. उवर्ररित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी चुरशीची निवडणूक झाली.जि.प. निवडणुकीची पाश्र्वभुमीया निवडणुकांना येत्या काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या या 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बरेच काही सांगून गेले आहेत. जास्तीत जास्त गावे आपल्या ताब्यात असावे, आपले उमेदवार सरपंचपदी असावे यासाठी काँग्रेस, भाजपने आटापीटा चालविला होता. वरिष्ठ पातळीवरून देखील याकडे पाहिले गेले होते. कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चुरस राहणार असल्याने नेत्यांनीही ही निवडणूक गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे निकाल लागताच दावे केले.प्रतिष्ठा पणालाथेट सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे अनेक स्थानिक नेते, पदाधिका:यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गाव पातळीवर नाते-गोते, संबध आणि गावगाडा लक्षात घ्यावा लागतो. शिवाय एकाएका मताचे महत्त्व असते. ही बाब लक्षात घेता स्थानिक नेत्यांनी राजकीय दबाव तंत्राचा देखील काही ठिकाणी वापर केला. त्या माध्यमातून आपल्या गटातील, पक्षातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी भावनिक आणि राजकीय डावपेचातून देखील आवाहन करण्यात आले होते.जल्लोष आणि उत्साहतहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. जसे निकाल बाहेर येत होते त्याप्रमाणे त्या त्या गावातील कार्यकर्ते मंडळी गुलाल उधळून जल्लोष करीत होती. गावागावात देखील जल्लोष करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पोलिसांनी संवेदनशील गावांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे निकालानंतर सायंकाळी उशीरार्पयत कुठेही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गंभीर प्रसंग उद्भवला नाही.