शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

जि.प.निवडणुकीची सेमी फायनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:59 IST

ग्रामपंचायत निवडणूक : प्रथमच दिसून आली सर्वच ठिकाणी राजकीय चूरस

नंदुरबार : येत काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व सेनेनेही चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. थेट सरपंचपदाची देखील निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त गावांवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रय} झाले. स्थानिक प्रश्न आणि राजकारणावरच ही निवडणूक लढविली गेली. असे असले तरी काँग्रेस व भाजपने दावे-प्रतिदावे केले आहेत. जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल गुरुवारी लागला. अनेक ठिकाणी निकालाचे गणित चुकले तर काही ठिकाणी अपेक्षीत निकाल लागले. थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्यामुळे सर्वच ठिकाणी चुरस देखील दिसून आली. असे असले तरी माघारीच्या वेळीच जवळपास 12 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. उवर्ररित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी चुरशीची निवडणूक झाली.जि.प. निवडणुकीची पाश्र्वभुमीया निवडणुकांना येत्या काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या या 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बरेच काही सांगून गेले आहेत. जास्तीत जास्त गावे आपल्या ताब्यात असावे, आपले उमेदवार सरपंचपदी असावे यासाठी काँग्रेस, भाजपने आटापीटा चालविला होता. वरिष्ठ पातळीवरून देखील याकडे पाहिले गेले होते. कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चुरस राहणार असल्याने नेत्यांनीही ही निवडणूक गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे निकाल लागताच दावे केले.प्रतिष्ठा पणालाथेट सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे अनेक स्थानिक नेते, पदाधिका:यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गाव पातळीवर नाते-गोते, संबध आणि गावगाडा लक्षात घ्यावा लागतो. शिवाय एकाएका मताचे महत्त्व असते. ही बाब लक्षात घेता स्थानिक नेत्यांनी राजकीय दबाव तंत्राचा देखील काही ठिकाणी वापर केला. त्या माध्यमातून आपल्या गटातील, पक्षातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी भावनिक आणि राजकीय डावपेचातून देखील आवाहन करण्यात आले होते.जल्लोष आणि उत्साहतहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. जसे निकाल बाहेर येत होते त्याप्रमाणे त्या त्या गावातील कार्यकर्ते मंडळी गुलाल उधळून जल्लोष करीत होती. गावागावात देखील जल्लोष करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पोलिसांनी संवेदनशील गावांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे निकालानंतर सायंकाळी उशीरार्पयत कुठेही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गंभीर प्रसंग उद्भवला नाही.