शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, होतकरू तरूण आपापल्या परीने मानवधर्म निभावून मदतीचे प्रयत्न करीत आहे. गरजुंना अन्नधान्याचे कीट वाटप, भुकेल्यांना भोजन वाटप तर असहाय्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे उपक्रम गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. सर्वच क्षेत्र संकटात सापडले असतांना याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.मजुरांअभावी शेतातील पीक काढायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकºयाला गावातील युवकांनी विनामूल्य मदत करून शेतातील संपूर्ण कलिंगड कापणी करून देत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.पिंप्री, ता.शहादा येथील शेतकरी गणेश मणिलाल पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या भितीने गावातील कोणीही शेतमजूर कलिंगड तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाते की, काय अशी भिती होती. मात्र गावातील शेतकरी व लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या तरूणांनी गणेश पाटील यांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांनी गणेश पाटील यांच्या कलिंगडचा ट्रक भरून दिला. यातून एकच संदेश जातो की, शेतकरी एकत्रित झाले तर सर्व शक्य आहे.एकीकडे शेतमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहेत. त्यात रोजगारासाठी परराज्यात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच तालुक्यात शेतमजुरांचा प्रश्न नेहमीचाच डोकेदुखी आहे. त्यामुळे पिंप्री येथील एकतेच्या घटनेने गावोगावच्या तरूण शेतकºयांनी गट शेती योजना अंमलात आणणे काळाची गरज ठरली आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. शेतीप्रधान समाजाचामुळ शेतीनिष्ठ पाया शाबूत व मजबूत ठेवायचा असेल तर आज पिंप्रीकर तरूण बांधवांनी दाखविलेल्या सहकाराचा मुलमंत्र अन्य शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.लॉकडॉऊनमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आता शेतमजुरांअभावी सुलतानी संकटाने हैराण झाला आहे. एरव्ही सातत्याने अस्मानी संकटाचा सामना करणाºया बळीराजास सामाजिक एकतेतून मदत करीत गावातील युवकांनी पुढाकार घेत शेतातील कलिंगड तोडून ट्रक ट्रॅक्टरमध्ये भरून सहाय्य केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. 'एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार पिंप्री ता.शहादा गावातील तरुणांनी एकत्रित येत केलेले हे मनुष्यबळाचे सहाय्य निश्चितच आदर्श व अनुकरणीय आहे. तसेच भविष्यातील गट शेतीला प्राधान्य देणारे आहे.