शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्याच्या मदतीला धावले युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. या संकट समयी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, होतकरू तरूण आपापल्या परीने मानवधर्म निभावून मदतीचे प्रयत्न करीत आहे. गरजुंना अन्नधान्याचे कीट वाटप, भुकेल्यांना भोजन वाटप तर असहाय्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे उपक्रम गेल्या ४० दिवसांपासून सुरू आहे. सर्वच क्षेत्र संकटात सापडले असतांना याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.मजुरांअभावी शेतातील पीक काढायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकºयाला गावातील युवकांनी विनामूल्य मदत करून शेतातील संपूर्ण कलिंगड कापणी करून देत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.पिंप्री, ता.शहादा येथील शेतकरी गणेश मणिलाल पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या भितीने गावातील कोणीही शेतमजूर कलिंगड तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाते की, काय अशी भिती होती. मात्र गावातील शेतकरी व लॉकडाऊनमुळे गावी आलेल्या तरूणांनी गणेश पाटील यांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांनी गणेश पाटील यांच्या कलिंगडचा ट्रक भरून दिला. यातून एकच संदेश जातो की, शेतकरी एकत्रित झाले तर सर्व शक्य आहे.एकीकडे शेतमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहेत. त्यात रोजगारासाठी परराज्यात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच तालुक्यात शेतमजुरांचा प्रश्न नेहमीचाच डोकेदुखी आहे. त्यामुळे पिंप्री येथील एकतेच्या घटनेने गावोगावच्या तरूण शेतकºयांनी गट शेती योजना अंमलात आणणे काळाची गरज ठरली आहे. त्याशिवाय तरणोपाय नाही. शेतीप्रधान समाजाचामुळ शेतीनिष्ठ पाया शाबूत व मजबूत ठेवायचा असेल तर आज पिंप्रीकर तरूण बांधवांनी दाखविलेल्या सहकाराचा मुलमंत्र अन्य शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.लॉकडॉऊनमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आता शेतमजुरांअभावी सुलतानी संकटाने हैराण झाला आहे. एरव्ही सातत्याने अस्मानी संकटाचा सामना करणाºया बळीराजास सामाजिक एकतेतून मदत करीत गावातील युवकांनी पुढाकार घेत शेतातील कलिंगड तोडून ट्रक ट्रॅक्टरमध्ये भरून सहाय्य केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. 'एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीनुसार पिंप्री ता.शहादा गावातील तरुणांनी एकत्रित येत केलेले हे मनुष्यबळाचे सहाय्य निश्चितच आदर्श व अनुकरणीय आहे. तसेच भविष्यातील गट शेतीला प्राधान्य देणारे आहे.