शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

आश्वासनांना कंटाळलेला युवक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:33 IST

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव

नंदुरबार : मोदी सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. केवळ बोलघेवडेपणा त्यांच्याकडे शिल्लक आहे. तो आता उघड झाल्याने भावनिक आवाहनाद्वारे जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रय} सुरू असल्याची टिका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केली. युवक क्रांती यात्रेनिमित्त ते नंदुरबारात आले होते.     युवक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर काढलेली युवक क्रांती यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात आगमन झाले. यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. दिनदयाल चौकात आयोजित सभेत विविध वक्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर आरोप केला. यावेळी केशवचंद यादव यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष विधी श्रनिवास, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, मनिष चौधरी, क्रिष्णा अल्वीवरू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरिष नाईक, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना केशव यादव म्हणाले, लाटेवर स्वार होत मोदी सरकार सत्तारूढ झाले. मोठमोठय़ा घोषणा केल्या परंतु एकही पुर्ण करण्यात आली नाही. लोकांचे पैसे घेवून मल्ल्या, मोदी पळून गेले. बँका बुडाल्या, नोटबंदीत भाजपने आपले हित साध्य करून घेतले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाकणार होते कुठे गेले. महागाई प्रचंड वाढली.  सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सरकार आता राम मंदीराचा मुद्दा उकरून काढून लोकांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप यादव यांनी केला. युवक काँग्रेसतर्फे क्रांती यात्रेनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष श्रनिवास यांनी राफेल विमान खरेदीत झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा चौधरी यांनी देखील टिका केली. प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्यातील युवक काँग्रेसची फळी मजबूत असून तळागाळार्पयतच्या लोकांची कामे केली जात आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल असे त्यांनी सांगितले. माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांनी केले. ते म्हणाले,    गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाने युवकांची निराशा केली आहे.  युवकांना काँग्रेसने     दिशा देण्याचा प्रय} केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युवकांविषयीची दूरदृष्टीमुळेच देशाने प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केली. सभेच्या शेवटी राफेल विमान घोटाळाच्या पाश्र्वभुमीवर पुठ्ठयाचे विमान व त्यात मोदी आणि अमित शहा हे बसलेले असल्याचे दाखविण्यात आले आहे. ते विमान यावेळी प्रतिकात्मक रित्या दाखविण्यात आले.