शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

आश्वासनांना कंटाळलेला युवक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:33 IST

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव

नंदुरबार : मोदी सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. केवळ बोलघेवडेपणा त्यांच्याकडे शिल्लक आहे. तो आता उघड झाल्याने भावनिक आवाहनाद्वारे जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रय} सुरू असल्याची टिका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केली. युवक क्रांती यात्रेनिमित्त ते नंदुरबारात आले होते.     युवक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर काढलेली युवक क्रांती यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात आगमन झाले. यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. दिनदयाल चौकात आयोजित सभेत विविध वक्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर आरोप केला. यावेळी केशवचंद यादव यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष विधी श्रनिवास, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, मनिष चौधरी, क्रिष्णा अल्वीवरू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरिष नाईक, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना केशव यादव म्हणाले, लाटेवर स्वार होत मोदी सरकार सत्तारूढ झाले. मोठमोठय़ा घोषणा केल्या परंतु एकही पुर्ण करण्यात आली नाही. लोकांचे पैसे घेवून मल्ल्या, मोदी पळून गेले. बँका बुडाल्या, नोटबंदीत भाजपने आपले हित साध्य करून घेतले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाकणार होते कुठे गेले. महागाई प्रचंड वाढली.  सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सरकार आता राम मंदीराचा मुद्दा उकरून काढून लोकांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप यादव यांनी केला. युवक काँग्रेसतर्फे क्रांती यात्रेनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष श्रनिवास यांनी राफेल विमान खरेदीत झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा चौधरी यांनी देखील टिका केली. प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्यातील युवक काँग्रेसची फळी मजबूत असून तळागाळार्पयतच्या लोकांची कामे केली जात आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल असे त्यांनी सांगितले. माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांनी केले. ते म्हणाले,    गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाने युवकांची निराशा केली आहे.  युवकांना काँग्रेसने     दिशा देण्याचा प्रय} केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युवकांविषयीची दूरदृष्टीमुळेच देशाने प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केली. सभेच्या शेवटी राफेल विमान घोटाळाच्या पाश्र्वभुमीवर पुठ्ठयाचे विमान व त्यात मोदी आणि अमित शहा हे बसलेले असल्याचे दाखविण्यात आले आहे. ते विमान यावेळी प्रतिकात्मक रित्या दाखविण्यात आले.