शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आश्वासनांना कंटाळलेला युवक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:33 IST

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव

नंदुरबार : मोदी सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. केवळ बोलघेवडेपणा त्यांच्याकडे शिल्लक आहे. तो आता उघड झाल्याने भावनिक आवाहनाद्वारे जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रय} सुरू असल्याची टिका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केली. युवक क्रांती यात्रेनिमित्त ते नंदुरबारात आले होते.     युवक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर काढलेली युवक क्रांती यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात आगमन झाले. यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. दिनदयाल चौकात आयोजित सभेत विविध वक्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर आरोप केला. यावेळी केशवचंद यादव यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष विधी श्रनिवास, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, मनिष चौधरी, क्रिष्णा अल्वीवरू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरिष नाईक, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना केशव यादव म्हणाले, लाटेवर स्वार होत मोदी सरकार सत्तारूढ झाले. मोठमोठय़ा घोषणा केल्या परंतु एकही पुर्ण करण्यात आली नाही. लोकांचे पैसे घेवून मल्ल्या, मोदी पळून गेले. बँका बुडाल्या, नोटबंदीत भाजपने आपले हित साध्य करून घेतले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाकणार होते कुठे गेले. महागाई प्रचंड वाढली.  सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सरकार आता राम मंदीराचा मुद्दा उकरून काढून लोकांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप यादव यांनी केला. युवक काँग्रेसतर्फे क्रांती यात्रेनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष श्रनिवास यांनी राफेल विमान खरेदीत झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा चौधरी यांनी देखील टिका केली. प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्यातील युवक काँग्रेसची फळी मजबूत असून तळागाळार्पयतच्या लोकांची कामे केली जात आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल असे त्यांनी सांगितले. माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांनी केले. ते म्हणाले,    गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाने युवकांची निराशा केली आहे.  युवकांना काँग्रेसने     दिशा देण्याचा प्रय} केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युवकांविषयीची दूरदृष्टीमुळेच देशाने प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केली. सभेच्या शेवटी राफेल विमान घोटाळाच्या पाश्र्वभुमीवर पुठ्ठयाचे विमान व त्यात मोदी आणि अमित शहा हे बसलेले असल्याचे दाखविण्यात आले आहे. ते विमान यावेळी प्रतिकात्मक रित्या दाखविण्यात आले.