शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

डीबीटी रद्द करण्याला आपले प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी धडगाव, मोलगी व नळगव्हाण येथे आयोजित जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केला.काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची सभा शुक्रवारी झाली. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार उदेसिंग पाडवी, रतन पाडवी, हारसिंग पावरा, सी.के.पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष बुला पाटील, बिज्या वसावे, सिताराम राऊत, पिरेसिंग पाडवी, शितल पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री अ‍ॅड.पाडवी म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या टीबीटीचा निर्णय रद्द करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या योजनांचा वेग गेल्या पाच वर्षात कमी झाला होता. जनता अनेक योजनांपासून वंचीत राहिली आहे. भाजप सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणामुळेच ते झाल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासी विकास विभागात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख करीत त्यांनी विरोधी नेत्यांवर आरोप केला.जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसच्या काळातच जिल्ह्यातील दुर्गम भागात पायाभूत विकास झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड.पद्माकर वळवी, उदेसिंग पाडवी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी नळगव्हाण, ता.तळोदा येथे माजी मंत्री दिगंबर पाडवी यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर तेथे त्यांनी कार्यकर्त्यांनशी संवाद साधून छोटेखानी सभा देखील घेतली. त्यानंतर मोलगी व धडगाव येथे त्यांच्या सभा झाल्या.दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच धडगाव तालुक्यात आल्याने त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.