शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

शेतकरी, व्यापा:यांच्या दृष्टीने यंदाची दिवाळी हिरमोड करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळे बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणातील वारंवारच्या बदलांमुळे साथीचे आजार आणि डेंग्यूची साथ थैमान घालत आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरंजन पडले आहे. यंदाची दिवाळी पावसातच जात असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून तर सूर्यदर्शन देखील झालेले नाही. दिवाळीसारखा हर्ष उल्लास आणि आनंदाच्या सणावर पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे व्यापा:यांसह सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे. पिकांचे नुकसानखरीप पिकाची काही ठिकाणी काढणी झाली आहे तर काही ठिकाणी काढण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच पावसाचा कहर सुरू असल्यामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जात आहे. यंदा चांगले पजर्न्यमान, चांगली पीक परिस्थिती    यामुळे शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, मका यांना कोंब फुटू लागले आहेत. काही ठिकाणी कणसं सडली आहेत. यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे.व्यापा:यांचा हिरमोडदिवाळीचा खरेदीचा उत्साह सर्वत्र असतांना पावसाच्या संततधारेमुळे त्यावर परिणाम दिसून येत आहे. विशेषत: लहान व रस्त्यावरच्या व्यापा:यांना त्याचा    मोठा फटका सहन करावा लागत  आहे. याउलट इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनिच्या वस्तूंना मागणी चांगली असल्यामुळे मोठे व्यापारी समाधानी आहेत. परंतु हातावर पोट असलेल्या व्यापा:यांच्या   व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्यामुळे मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. अनेक व्यापा:यांनी ती खंत बोलून देखील दाखविली आहे. आधीच पावसाळ्यात मंदीचे सावट होते आता दिवाळीतही अपेक्षीत व्यवसाय न झाल्याने नाराजीही व्यक्त केली. 

उलाढाल निम्म्यावर.. यंदाच्या दिवाळीतील उलाढाल निम्म्यावर आली आहे. निवडणुकांमुळे 21 तारखेर्पयत बाजारात फारशी रौनक नव्हती. निवडणुका संपल्यानंतर पावसाने व्यत्यय     आणला आहे. यामुळे दिवाळीसारख्या सणाला व्यवसाय होत नसल्याने लहान व मध्यम व्यापारी हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्याने आणि वातावरणही सर्वसामान्य राहिल्याने बाजारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी   उसळली होती. दोन दिवसांपासून तर वर्दळच कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. यामुळे दिवाळीसाठी लागणा:या वस्तूंची मागणी निम्म्यावर आली आहे.