शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

जिल्ह्यात यंदा १०० टक्के रब्बी पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या झाल्या आहेत़ नवापुर तालुका वगळता इतर पाचही तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेरा झाला असल्याने शेतशिवारात चैतन्य आहे़सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक अशीच स्थिती आहे़ यातून विहिरींची पातळी ही तब्बल अडीच मीटरपर्यंत वर आली आहे़ यातून शेतकऱ्यांना येत्या मे महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याने त्यांच्याकडून आॅक्टोबर अखेरीपासून रब्बी पेरणी सुरु झाली होती़ यात गहू, मका, हरभरा, इतर कडधान्य तसेच भाजीपाला पिकांचा समावेश आहे़ एकीकडे धान्य, तृृणधान्य, गळीत आणि रब्बी पिकांच्या पेरण्या वाढल्या असताना दुसरीकडे ज्वारी पेरा मात्र निम्म्यावर आला आहे़ सर्वच तालुक्यात रब्बी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे़ यातून जिल्ह्यात केवळ ५७ टक्के रब्बी ज्वारी पेरणी झली आहे़ बºयाच ठिकाणी कापूस हंगाम लांबल्याने शेतशिवारात अद्यापही पिके आहेत़ कापूस पूर्णपणे निघाल्यानंतर ज्वारीचा पेरा होण्याची शक्यता असल्याने यात वाढ होण्याचीही शक्यता आहे़ परंतू हवामानाच्यादृष्टीने ही शक्यता कमीच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ दरम्यान कांद्याच्या दरांनी गेल्या वर्षभरात शेतकºयांना दिलासा दिल्याने जिल्ह्याच्या विविध भागात कांदा लागवडही वाढत असल्याचे चित्र आहे़ पावसामुळे दोन हजार हेक्टरपर्यंत भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढीस लागले असून याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात आहे़ बºयाच ठिकाणी भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन आल्याने दरांमध्ये आतापासून घसरण सुरु झाल्याचेही चित्र आहे़४जिल्ह्यात सर्व सहा तालुक्यात आजअखेरीस २४ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र गहू पेरा करण्यात आला आहे़ नंदुरबार ९ हजार ३३१, नवापुर ३ हजार ३२८, अक्कलकुवा १ हजार ४२५, शहादा ६ हजार १५०, तळोदा ३ हजार ४३६ तर धडगाव तालुक्यात ६८५ हेक्टर क्षेत्रात गहू पेरा झाला आहे़४प्रमुख रब्बी पिकांपैकी एक असलेली ज्वारीचा पेरा मात्र यंदा निम्म्यावर आला आहे़ वार्षिक १६ हजार हेक्टर पेरा होेणारी ज्वारी आजअखेरीस ९ हजार २३१ हेक्टर क्षेत्रातच मर्यादित आहे़ यात नंदुरबार १३८, नवापुर ३ हजार २३८, अक्कलकुवा २ हजार ३१५, शहादा २ हजार ३६०, तळोदा १ हजार १५९ तर धडगाव तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पिक आहे़४रब्बी मक्याची स्थिती मात्र सुधाल्याचे चित्र आहे़ आतापर्यंत ५ हजार ६५ हेक्टरवर रब्बी मका पेरणी पूूर्ण झाली आहे़ नंदुरबार ६८४, नवापुर २ हजार ३७०, अक्कलकुवा १०९, तळोदा १८८ तर धडगाव तालुक्यात ७३६ हेक्टर मका पेरा झाला आहे़जिल्ह्यात गहूनंतर सर्वाधिक पसंती असलेल्या हरभºयाची स्थितीही काही अंशी समाधानकारक अशीच आहे़ नंदुरबार तालुक्यात २ हजार ४०३, नवापुर ३ हजार २८०, अक्कलकुवा २ हजार २७, शहादा ४ हजार ५८८, तळोदा १ हजार ३८७ तर धडगाव तालुक्यात १ हजार ३३९ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती़ जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण २० हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरणी करण्याचे निर्धारण होते़ परंतू प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात १५ हजार २४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे़एकीकडे धान्य आणि कडधान्यांची स्थिती शेतशिवारात चांगली असताना तेलबिया पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे़ नंदुरबार तालुक्यात एक हेक्टरही तेलबिया पिक नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी आणि भूईमूग या पिकांना किमान २ हजार हेक्टरची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात केवळ ६५१ हेक्टरवर तेलबिया पिके असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे़