शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

जिल्ह्यात यंदा १०० टक्के रब्बी पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्थिर असलेल्या भूजल पातळीच्या बळावर जिल्ह्यात यंदा पाच वर्षांच्या कालावधीनंतर १०० टक्के रब्बी पेरण्या झाल्या आहेत़ नवापुर तालुका वगळता इतर पाचही तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेरा झाला असल्याने शेतशिवारात चैतन्य आहे़सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक अशीच स्थिती आहे़ यातून विहिरींची पातळी ही तब्बल अडीच मीटरपर्यंत वर आली आहे़ यातून शेतकऱ्यांना येत्या मे महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याने त्यांच्याकडून आॅक्टोबर अखेरीपासून रब्बी पेरणी सुरु झाली होती़ यात गहू, मका, हरभरा, इतर कडधान्य तसेच भाजीपाला पिकांचा समावेश आहे़ एकीकडे धान्य, तृृणधान्य, गळीत आणि रब्बी पिकांच्या पेरण्या वाढल्या असताना दुसरीकडे ज्वारी पेरा मात्र निम्म्यावर आला आहे़ सर्वच तालुक्यात रब्बी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे़ यातून जिल्ह्यात केवळ ५७ टक्के रब्बी ज्वारी पेरणी झली आहे़ बºयाच ठिकाणी कापूस हंगाम लांबल्याने शेतशिवारात अद्यापही पिके आहेत़ कापूस पूर्णपणे निघाल्यानंतर ज्वारीचा पेरा होण्याची शक्यता असल्याने यात वाढ होण्याचीही शक्यता आहे़ परंतू हवामानाच्यादृष्टीने ही शक्यता कमीच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ दरम्यान कांद्याच्या दरांनी गेल्या वर्षभरात शेतकºयांना दिलासा दिल्याने जिल्ह्याच्या विविध भागात कांदा लागवडही वाढत असल्याचे चित्र आहे़ पावसामुळे दोन हजार हेक्टरपर्यंत भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढीस लागले असून याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात आहे़ बºयाच ठिकाणी भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन आल्याने दरांमध्ये आतापासून घसरण सुरु झाल्याचेही चित्र आहे़४जिल्ह्यात सर्व सहा तालुक्यात आजअखेरीस २४ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र गहू पेरा करण्यात आला आहे़ नंदुरबार ९ हजार ३३१, नवापुर ३ हजार ३२८, अक्कलकुवा १ हजार ४२५, शहादा ६ हजार १५०, तळोदा ३ हजार ४३६ तर धडगाव तालुक्यात ६८५ हेक्टर क्षेत्रात गहू पेरा झाला आहे़४प्रमुख रब्बी पिकांपैकी एक असलेली ज्वारीचा पेरा मात्र यंदा निम्म्यावर आला आहे़ वार्षिक १६ हजार हेक्टर पेरा होेणारी ज्वारी आजअखेरीस ९ हजार २३१ हेक्टर क्षेत्रातच मर्यादित आहे़ यात नंदुरबार १३८, नवापुर ३ हजार २३८, अक्कलकुवा २ हजार ३१५, शहादा २ हजार ३६०, तळोदा १ हजार १५९ तर धडगाव तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पिक आहे़४रब्बी मक्याची स्थिती मात्र सुधाल्याचे चित्र आहे़ आतापर्यंत ५ हजार ६५ हेक्टरवर रब्बी मका पेरणी पूूर्ण झाली आहे़ नंदुरबार ६८४, नवापुर २ हजार ३७०, अक्कलकुवा १०९, तळोदा १८८ तर धडगाव तालुक्यात ७३६ हेक्टर मका पेरा झाला आहे़जिल्ह्यात गहूनंतर सर्वाधिक पसंती असलेल्या हरभºयाची स्थितीही काही अंशी समाधानकारक अशीच आहे़ नंदुरबार तालुक्यात २ हजार ४०३, नवापुर ३ हजार २८०, अक्कलकुवा २ हजार २७, शहादा ४ हजार ५८८, तळोदा १ हजार ३८७ तर धडगाव तालुक्यात १ हजार ३३९ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती़ जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण २० हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरणी करण्याचे निर्धारण होते़ परंतू प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात १५ हजार २४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे़एकीकडे धान्य आणि कडधान्यांची स्थिती शेतशिवारात चांगली असताना तेलबिया पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे़ नंदुरबार तालुक्यात एक हेक्टरही तेलबिया पिक नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, मोहरी आणि भूईमूग या पिकांना किमान २ हजार हेक्टरची अपेक्षा होती़ परंतू प्रत्यक्षात केवळ ६५१ हेक्टरवर तेलबिया पिके असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे़