शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
6
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
7
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
8
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
9
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
10
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
11
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
12
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
13
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
14
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
15
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
16
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
17
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
18
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
19
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

राज्य शासनाने दहावीच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. ५०, ३०, २० ही सूत्रे अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर ...

राज्य शासनाने दहावीच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. ५०, ३०, २० ही सूत्रे अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर असली तरी जे विद्यार्थी अभ्यासू आहेत, त्यांना यामुळे नुकसान होणार असून अशा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश कसा मिळू शकेल याची चिंता लागली आहे. कारण जे विद्यार्थी अभ्यासू आहेत त्यांच्या दृष्टीने दहावीची परीक्षा घेतली असती तर गुणांच्या आधारे अशा विद्यार्थ्यांना अकरावी साठी आपले आवडीचे महाविद्यालय भेटले असते. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावीची परीक्षा न घेता नववीच्या गुणांच्या आधारे तसेच अंतर्गत मूल्यमापन आधारे गुण देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य तसेच हुशार विद्यार्थी दहावीच्या निकालात एकाच रांगेत दिसून येणार आहेत.

दहावीच्या निकालासाठी गृहपाठ, तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शाळांना पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. अंतर्गत लेखी मूल्यमापन अनेक शाळांचे तयार असले तरी बहुतांश शाळांचे अंतर्गत मूल्यमापन तयार असेलच असे नाही. कारण शाळा चालू झाल्या होत्या त्यावेळेस सर्व शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांचा कल दिसून येत होता. शिवाय विद्यार्थ्यांच्या वही, पुस्तक यांना स्पर्श करावयाचा नसल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी कानोसा घेता आला नाही. तरी सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. २०२० - २०२१ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी दहावीला आहेत, त्यांपैकी जे हुशार विद्यार्थी असतील त्यांना आयुष्यभर परीक्षा विना आपण अकरावी साठी पुढे ढकलले गेल्याचे मनात सलत राहील. हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी सीईटीमध्ये संधी शोधावी लागणार आहे.

दहावी बोर्डाचे वर्ष असल्यामुळे यावर्षी खूप अभ्यास केला होता. मात्र नववीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल सर्व विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असला तरी दहावीची परीक्षा घेतली असती तर अकरावी प्रवेश सुलभ झाला असता.

सुहास माळी, जयनगर.

दहावीची परीक्षा ऑफलाईन झाली असती तर अभ्यासू विद्यार्थ्यांना आनंदच झाला असता, मात्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निकाल तयार करतांना हुशार विद्यार्थी व सर्वसामान्य विद्यार्थी एकाच रँकमध्ये येणार नाहीत. याची दक्षता निकाल तयार करतांना घ्यायला हवी.

धनराज दत्तू माळी, जयनगर.