शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

यंदा अवघ्या ३५ टक्के क्षेत्रावर काढला गेला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

नंदुरबार : यंदा उशिराने आलेला पाऊस, त्यामुळे उशिराने झालेल्या पेरण्या तसेच बदललेले निकष यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ ...

नंदुरबार : यंदा उशिराने आलेला पाऊस, त्यामुळे उशिराने झालेल्या पेरण्या तसेच बदललेले निकष यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात पीक विम्याच्या न मिळालेल्या परताव्यामुळेही यंदा पीकविमा कमी काढला गेल्याचे बोलले जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थात पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. ज्या क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या त्या क्षेत्रातील पीक करपू लागलेे होते. त्यामुळे यंदा पीक विमा उतरविण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता होती. शिवाय पीक विम्याच्या शेवटची मुदत होईपर्यंत जवळपास ५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नव्हत्या. असे असतांना बँक अधिकारी पीक विमा काढण्यासाठी पीक पेरणीचा अहवाल मागवत होते. पेरणीच नाही तर पीक पेरणीचा अहवाल आणणार कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सरासरी क्षेत्राचा ३५ टक्के क्षेत्रावर जेमतेम पीकविमा काढला गेला आहे.

गेल्या वर्षी तब्बल ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विमा काढला होता. पंरतु गेल्या वर्षीचा खरीप हंगाम चांगला होता. पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याचे पैसे मिळाले नाहीत. विमा काढून काहीच उपयोग होत नाही असा समज शेतकऱ्यांनी करून घेतला. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही. ‘कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायाचा का?’, असा खोचक प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परंतु विम्यामुळे पिकांना सुरक्षा कवच मिळते.

पीक विमा काढला पाहिजे, असा देखील अनेकांचा मत प्रवाह आहे. कृषी विभाग यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असते. परंतु पीक विम्याचा परतावा कमी राहत असल्याने तसेच यंदा विविध निकष बदलण्यात आल्याने देखील यंदा परिणाम दिसून येत असल्याचे चित्र आहे.