शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यंदा अवघ्या ३५ टक्के क्षेत्रावर काढला गेला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

नंदुरबार : यंदा उशिराने आलेला पाऊस, त्यामुळे उशिराने झालेल्या पेरण्या तसेच बदललेले निकष यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ ...

नंदुरबार : यंदा उशिराने आलेला पाऊस, त्यामुळे उशिराने झालेल्या पेरण्या तसेच बदललेले निकष यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात पीक विम्याच्या न मिळालेल्या परताव्यामुळेही यंदा पीकविमा कमी काढला गेल्याचे बोलले जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थात पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. ज्या क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या त्या क्षेत्रातील पीक करपू लागलेे होते. त्यामुळे यंदा पीक विमा उतरविण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता होती. शिवाय पीक विम्याच्या शेवटची मुदत होईपर्यंत जवळपास ५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नव्हत्या. असे असतांना बँक अधिकारी पीक विमा काढण्यासाठी पीक पेरणीचा अहवाल मागवत होते. पेरणीच नाही तर पीक पेरणीचा अहवाल आणणार कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यामुळे यंदा पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सरासरी क्षेत्राचा ३५ टक्के क्षेत्रावर जेमतेम पीकविमा काढला गेला आहे.

गेल्या वर्षी तब्बल ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विमा काढला होता. पंरतु गेल्या वर्षीचा खरीप हंगाम चांगला होता. पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याचे पैसे मिळाले नाहीत. विमा काढून काहीच उपयोग होत नाही असा समज शेतकऱ्यांनी करून घेतला. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही. ‘कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायाचा का?’, असा खोचक प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परंतु विम्यामुळे पिकांना सुरक्षा कवच मिळते.

पीक विमा काढला पाहिजे, असा देखील अनेकांचा मत प्रवाह आहे. कृषी विभाग यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असते. परंतु पीक विम्याचा परतावा कमी राहत असल्याने तसेच यंदा विविध निकष बदलण्यात आल्याने देखील यंदा परिणाम दिसून येत असल्याचे चित्र आहे.