शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नागपंचमीला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर ...

नंदुरबार : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर दिवशी मात्र ठार मारले जाते. वर्षभर सापांचा बळी घेण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत असल्याने वनविभागाने याबाबत जनजागृती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात जमिनीतून येणारी उष्णता व बिळांमध्ये पाणी शिरल्यावर साप बाहेर येतात. यातून मग नागरी वस्तींपर्यंत त्यांचा संचार सुरू होता. यातून मग साप दिसला की त्याला जागीच ठेचला पाहिजे अशी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. साप विषारी की बिनविषारी याचीही पडताळणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. यातून जिल्ह्यातून चित्रांग आणि गरगल हे दोन सर्प कायमचे नामशेष झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते.

साप हे थंड आणि दमट जागा शोधतात त्यामुळे ते मानवी वस्तीत भक्ष्य, आणि आसरा शोधण्यासाठी येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ असल्याने एकापेक्षा अधिक साप आढळतात.

विषारी : घोणस, मण्यार, फुरसे, नाग, हिरवा चापडा, चापडा, मांजऱ्या, हरणटोळ, फॉर्स्टनचा मांजऱ्या, तपकिरी हरणटोळ.

बिनविषारी : अजगर, मांडूळ, कवड्या, धामण, नानेटी, त्रावणकोर कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, वाळा, पहाडी तस्कर, कुकरी सर्प

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. शेतात धान्याची नासाडी करणारे उंदीर खाण्याचे काम साप हा करत असतो. एकप्रकारे साप शेतकऱ्याची अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो. मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज व सापांबद्दल असलेली भीती यामुळे सापाला अनेकजण शत्रुच समजतात.

साप आढळला तर...

नागरिकांना घरात साप आढळल्यास त्याला मारून न टाकता वनविभाग किंवा सर्पमित्रांना कळवावे,

सर्पमित्र येईपर्यंत सापाच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष देत राहिले पाहिजे.

सापापासून लहान मुले, पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे, साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तरच त्याला पकडावे अन्यथा सर्पमित्र येण्यापर्यंत वाट पाहून लक्ष ठेवावे.