शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

स्वच्छतेवर जिल्हा परिषदेत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल ...

कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक सहभागी झाले होते.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा टप्पा-२ हे अभियान सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. शासनामार्फत माझी वसुंधरा टप्पा-२ राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच अभियान राबविण्याबाबत टप्पा - १ व टप्पा - २ यात अभियानसाठी राबविण्यात येणारे उपक्रम व गुणांकन पद्धती याविषयी माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी राबवायचे उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा कक्षातील युवराज सूर्यवंशी यांनी पंचतत्त्व व त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोणकोणते उपक्रम राबविण्यात यावेत व त्यासाठी असणारी गुणांकन पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, वडाळी, बामखेडा, खेड दिगर, कल्साडी, पुरुषोत्तम नगर, ब्राह्मणपुरी अक्कलकुवा, राजमोही, मोठी नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापूर तालुक्यातील खोकसा, तळवे, गणेश बुधावल तालुका तळोदा अशा एकूण १५ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, मनरेगा विभागाचे तांत्रिक कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.