शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना धावपळ करावी लागत आहे. हे कामगार जीवाचा धोका पत्करुन रिक्षाच्या टपावर बसून प्रवास करीत आहे.जिल्ह्यातील मजुरांना बांधकाम व शेतमजुरीशिवाय दुसरा कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रोजगाराच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. शहरी भागातील मजुरांना कामावर जाण्यासाठी कुठल्याही वेळेस वाहन उपलब्ध होत असते. ही बाब ग्रामीण भागातील मजुरांच्या नशिबात नसल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रकाशा, तºहावद, वैजाली, काथर्दे या भागातील मजुरांना देखील वेळेवर व अपेक्षेनुसार वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली नाही. या भागात परिवहन महामंडळाच्या फारशा बसेस जात नाही, त्यामुळे तेथील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. वाहतुकीच्या सुविधेअभावी या भागातील शेतमजूर व बांधकाम कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या कामगारांना अल्पश: खाजगी वाहतुकीवरच विसंबून राहावे लागत आहे.या भागातील बहुतांश रस्त्यांची अरुंद, खड्डे पडलेले, खचलेल्या साईडपट्या अशी परिस्थिती आहे. अशा या रस्त्यांवरुन रिक्षांच्या टपावर बसून मजूरांना प्रवास करावा लागत आहे. ही वाहतुक या मजूरांच्या जीवाला धोक्याची ठरत आहे. धोका असला तरी कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी या मजूरांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते टपावर का असेना बसून वेळेवर नियोजित कामावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या मजुरांसह अन्य नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून आवश्यकतेनुसार बस उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षाच्या टपावरुन होणाºया प्रवासी वाहतुकीत रिक्षाचालक अथवा प्रवाशांचा दोष नव्हे हा तर गरिबी व वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देणाºया यंत्रणेचा असल्याचे म्हटले जात आहे. कामावर वेळेवर न पोहोचल्यास या कामगारांना त्या-त्या दिवसाचा रोज बुडवावा लागतो.या भागातील सर्व मजुरांचा उदरनिर्वाह हा केवळ हातावर अवलंबून आहे. त्यामुळे या मजुरांना एका दिवसाचा रोज बुडाल्यास त्या मजुरासह त्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ येते.कुटुंबियांची संभाव्य उपासमार टाळण्यासाठी मजुरांनी वेळेवर कामावर पोहोचणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या मजुरांकडून धावपळ करीत मिळेल त्या वाहनाने वेळेतच कामावर पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.प्रकाशा ते काथर्देदिगर या भागातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी प्रतिकुल देखील ठरतात. खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे प्रवाशांना धोका अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत मजूर प्रवास करीत आहे.