शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना धावपळ करावी लागत आहे. हे कामगार जीवाचा धोका पत्करुन रिक्षाच्या टपावर बसून प्रवास करीत आहे.जिल्ह्यातील मजुरांना बांधकाम व शेतमजुरीशिवाय दुसरा कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रोजगाराच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. शहरी भागातील मजुरांना कामावर जाण्यासाठी कुठल्याही वेळेस वाहन उपलब्ध होत असते. ही बाब ग्रामीण भागातील मजुरांच्या नशिबात नसल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रकाशा, तºहावद, वैजाली, काथर्दे या भागातील मजुरांना देखील वेळेवर व अपेक्षेनुसार वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली नाही. या भागात परिवहन महामंडळाच्या फारशा बसेस जात नाही, त्यामुळे तेथील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. वाहतुकीच्या सुविधेअभावी या भागातील शेतमजूर व बांधकाम कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या कामगारांना अल्पश: खाजगी वाहतुकीवरच विसंबून राहावे लागत आहे.या भागातील बहुतांश रस्त्यांची अरुंद, खड्डे पडलेले, खचलेल्या साईडपट्या अशी परिस्थिती आहे. अशा या रस्त्यांवरुन रिक्षांच्या टपावर बसून मजूरांना प्रवास करावा लागत आहे. ही वाहतुक या मजूरांच्या जीवाला धोक्याची ठरत आहे. धोका असला तरी कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी या मजूरांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते टपावर का असेना बसून वेळेवर नियोजित कामावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या मजुरांसह अन्य नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून आवश्यकतेनुसार बस उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षाच्या टपावरुन होणाºया प्रवासी वाहतुकीत रिक्षाचालक अथवा प्रवाशांचा दोष नव्हे हा तर गरिबी व वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देणाºया यंत्रणेचा असल्याचे म्हटले जात आहे. कामावर वेळेवर न पोहोचल्यास या कामगारांना त्या-त्या दिवसाचा रोज बुडवावा लागतो.या भागातील सर्व मजुरांचा उदरनिर्वाह हा केवळ हातावर अवलंबून आहे. त्यामुळे या मजुरांना एका दिवसाचा रोज बुडाल्यास त्या मजुरासह त्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ येते.कुटुंबियांची संभाव्य उपासमार टाळण्यासाठी मजुरांनी वेळेवर कामावर पोहोचणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या मजुरांकडून धावपळ करीत मिळेल त्या वाहनाने वेळेतच कामावर पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.प्रकाशा ते काथर्देदिगर या भागातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी प्रतिकुल देखील ठरतात. खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे प्रवाशांना धोका अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत मजूर प्रवास करीत आहे.