शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कामगार नोंदणी ठरतेय केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:34 IST

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ...

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े आतार्पयत या अभियानांतर्गत धुळे येथे 10 हजार 722, तर नंदुरबार येथे 1 हजार 160 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केवळ चार कर्मचा:यांचे पथक देण्यात आले आह़े त्यातील एक कर्मचारी कारकून असून त्याचा  प्रत्यक्ष नोंदणी कामात सहभाग नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान, धुळे-साक्री, शिरपूर-शिंदखेडा, नंदुरबार-नवापूर व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका अधिका:याची नेमणूक करण्यात आली आह़े संपूर्ण राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असत़े परंतु वरील 10 जिल्ह्यांमध्ये  विशेष अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाला ‘अटल विश्वकर्मा अभियान’ असे नाव देण्यात आले  आह़े राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील बांधकाम कामगार दुर्लक्षित आहेत़ त्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने ते त्यापासून वंचित राहत असतात़ त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यामुळे शासनाकडून अशा कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आह़े परंतु असे करीत असताना कामगार नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविणे गरजेचे होत़े परंतु तसे न करता केवळ चार सदस्यांच्या पथकावर दोन जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी आल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आह़े कामगारांची नोंदणी करताना कर्मचा:यांची मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे याचा परिणाम कामगारांच्या नोंदणी अभियानावरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही़