शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

कामगार नोंदणी ठरतेय केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:34 IST

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ...

नंदुरबार : राज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े परंतु कामगारांची नोंदणी करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी अवघ्या चार कर्मचा:यांचे एक पथक नियुक्त केले असल्याने कामगार नोंदणी मोहीम केवळ फार्स ठरु पाहतेय़4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े आतार्पयत या अभियानांतर्गत धुळे येथे 10 हजार 722, तर नंदुरबार येथे 1 हजार 160 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आह़े धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी केवळ चार कर्मचा:यांचे पथक देण्यात आले आह़े त्यातील एक कर्मचारी कारकून असून त्याचा  प्रत्यक्ष नोंदणी कामात सहभाग नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान, धुळे-साक्री, शिरपूर-शिंदखेडा, नंदुरबार-नवापूर व धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका अधिका:याची नेमणूक करण्यात आली आह़े संपूर्ण राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असत़े परंतु वरील 10 जिल्ह्यांमध्ये  विशेष अभियान राबविण्यात येत आह़े या अभियानाला ‘अटल विश्वकर्मा अभियान’ असे नाव देण्यात आले  आह़े राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील बांधकाम कामगार दुर्लक्षित आहेत़ त्यांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने ते त्यापासून वंचित राहत असतात़ त्यामुळे संबंधितांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांचे जीवनमान उंचवावे यामुळे शासनाकडून अशा कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आह़े परंतु असे करीत असताना कामगार नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविणे गरजेचे होत़े परंतु तसे न करता केवळ चार सदस्यांच्या पथकावर दोन जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची जबाबदारी आल्याने या अभियानात खोडा निर्माण झाला आह़े कामगारांची नोंदणी करताना कर्मचा:यांची मोठय़ा प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे याचा परिणाम कामगारांच्या नोंदणी अभियानावरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही़