शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रापापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम निधीअभावी पाच महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण ...

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण २५.६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावासदेखील प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तथापि, केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने परवानगीकरिता तब्बल १० ते १५ वर्षे अडवणूक केली होती. त्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतरही काही स्थानिक गावकऱ्यांच्या बुडीत जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यात पुन्हा अडथळा निर्माण झाला होता. हा प्रश्न तत्कालीन जिल्हा प्रशासनाने सोडविल्यानंतर धरणाचे काम सुरू झाले. मात्र, एवढी अडथळ्याची शर्यत पार करत प्रकल्पाच्या कामास पाहिजे तशी गती मिळाली नाही. सध्या धरणाचे काम ३०, ३५ टक्के झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सांडवा व पिचिंगचे काम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण ५८ कोटींच्या प्रकल्पास आतापर्यंत १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात पुढील काही रक्कम संबंधित ठेकेदाराने स्वतःच्या खिशातून खर्च केली आहे. आता तर निधीअभावी या धरणाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून बंदच पडले आहे. वास्तविक सध्या पावसानेदेखील मोठी ओढ दिली आहे. साहजिकच कामासदेखील गती मिळाली असती. मात्र, निधीने धरणाच्या कामात खोडा घातला आहे. संबंधित यंत्रणेने निधीसाठी शासनाकडे तातडीने कार्यवाही करून तो उपलब्ध करून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीस कोटींची मागणीृ

धरणाच्या पुढील कामासाठी नंदुरबार येथील लघु, मध्यम प्रकल्प कार्यालयाने जलसंपदा विभागाकडे साधारण ३० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव गेल्या पाच महिन्यांपूर्वीच पाठवला आहे; परंतु सुधारित प्रशासकीय मान्यताअभावी तो तसाच धूळ खात पडला आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला आहे; परंतु अजूनही दाद मिळाली नाही. साहजिक या प्रकल्पाचं कामही बंद पडले आहे.

दीड हजार एकर क्षेत्र येतेय ओलिताखाली

रापापूर लघुसिंचन प्रकल्पांच्या खाली रापापूरसह चौगाव, अमोणी, रेवांनगर, धवळीविहीर, दलेलपूर अशा सहा ते सात गावांमधील जवळपास दीड हजार एकर जमीन सिंचनखाली येणार आहे. त्यातही सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे. असे असताना या सिंचन प्रकल्पाकरिता निधीसाठी शासनाने हात आखडता ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.