शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

रापापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम निधीअभावी पाच महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण ...

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण २५.६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावासदेखील प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तथापि, केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने परवानगीकरिता तब्बल १० ते १५ वर्षे अडवणूक केली होती. त्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतरही काही स्थानिक गावकऱ्यांच्या बुडीत जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यात पुन्हा अडथळा निर्माण झाला होता. हा प्रश्न तत्कालीन जिल्हा प्रशासनाने सोडविल्यानंतर धरणाचे काम सुरू झाले. मात्र, एवढी अडथळ्याची शर्यत पार करत प्रकल्पाच्या कामास पाहिजे तशी गती मिळाली नाही. सध्या धरणाचे काम ३०, ३५ टक्के झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सांडवा व पिचिंगचे काम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण ५८ कोटींच्या प्रकल्पास आतापर्यंत १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात पुढील काही रक्कम संबंधित ठेकेदाराने स्वतःच्या खिशातून खर्च केली आहे. आता तर निधीअभावी या धरणाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून बंदच पडले आहे. वास्तविक सध्या पावसानेदेखील मोठी ओढ दिली आहे. साहजिकच कामासदेखील गती मिळाली असती. मात्र, निधीने धरणाच्या कामात खोडा घातला आहे. संबंधित यंत्रणेने निधीसाठी शासनाकडे तातडीने कार्यवाही करून तो उपलब्ध करून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीस कोटींची मागणीृ

धरणाच्या पुढील कामासाठी नंदुरबार येथील लघु, मध्यम प्रकल्प कार्यालयाने जलसंपदा विभागाकडे साधारण ३० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव गेल्या पाच महिन्यांपूर्वीच पाठवला आहे; परंतु सुधारित प्रशासकीय मान्यताअभावी तो तसाच धूळ खात पडला आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला आहे; परंतु अजूनही दाद मिळाली नाही. साहजिक या प्रकल्पाचं कामही बंद पडले आहे.

दीड हजार एकर क्षेत्र येतेय ओलिताखाली

रापापूर लघुसिंचन प्रकल्पांच्या खाली रापापूरसह चौगाव, अमोणी, रेवांनगर, धवळीविहीर, दलेलपूर अशा सहा ते सात गावांमधील जवळपास दीड हजार एकर जमीन सिंचनखाली येणार आहे. त्यातही सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे. असे असताना या सिंचन प्रकल्पाकरिता निधीसाठी शासनाने हात आखडता ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.