शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रापापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम निधीअभावी पाच महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण ...

तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीवर लघुसिंचन प्रकल्प बांधण्यासाठी शासनाकडून सन १९९८ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी तेव्हा साधारण २५.६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावासदेखील प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तथापि, केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने परवानगीकरिता तब्बल १० ते १५ वर्षे अडवणूक केली होती. त्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतरही काही स्थानिक गावकऱ्यांच्या बुडीत जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यात पुन्हा अडथळा निर्माण झाला होता. हा प्रश्न तत्कालीन जिल्हा प्रशासनाने सोडविल्यानंतर धरणाचे काम सुरू झाले. मात्र, एवढी अडथळ्याची शर्यत पार करत प्रकल्पाच्या कामास पाहिजे तशी गती मिळाली नाही. सध्या धरणाचे काम ३०, ३५ टक्के झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सांडवा व पिचिंगचे काम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण ५८ कोटींच्या प्रकल्पास आतापर्यंत १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात पुढील काही रक्कम संबंधित ठेकेदाराने स्वतःच्या खिशातून खर्च केली आहे. आता तर निधीअभावी या धरणाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून बंदच पडले आहे. वास्तविक सध्या पावसानेदेखील मोठी ओढ दिली आहे. साहजिकच कामासदेखील गती मिळाली असती. मात्र, निधीने धरणाच्या कामात खोडा घातला आहे. संबंधित यंत्रणेने निधीसाठी शासनाकडे तातडीने कार्यवाही करून तो उपलब्ध करून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

तीस कोटींची मागणीृ

धरणाच्या पुढील कामासाठी नंदुरबार येथील लघु, मध्यम प्रकल्प कार्यालयाने जलसंपदा विभागाकडे साधारण ३० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव गेल्या पाच महिन्यांपूर्वीच पाठवला आहे; परंतु सुधारित प्रशासकीय मान्यताअभावी तो तसाच धूळ खात पडला आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला आहे; परंतु अजूनही दाद मिळाली नाही. साहजिक या प्रकल्पाचं कामही बंद पडले आहे.

दीड हजार एकर क्षेत्र येतेय ओलिताखाली

रापापूर लघुसिंचन प्रकल्पांच्या खाली रापापूरसह चौगाव, अमोणी, रेवांनगर, धवळीविहीर, दलेलपूर अशा सहा ते सात गावांमधील जवळपास दीड हजार एकर जमीन सिंचनखाली येणार आहे. त्यातही सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे. असे असताना या सिंचन प्रकल्पाकरिता निधीसाठी शासनाने हात आखडता ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.